शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षे शिकत आलो, कुणाला शिकवायला कधी गेलो नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘शंभरावं वर्ष लागतंय...कदाचित विधात्यानंच हे लिहून ठेवलं असेल. ती त्याची इच्छा असावी. या शंभर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘शंभरावं वर्ष लागतंय...कदाचित विधात्यानंच हे लिहून ठेवलं असेल. ती त्याची इच्छा असावी. या शंभर वर्षांच्या काळात मी खूप शिकलो. शिकविण्याचा आव मी कधी आणला नाही’, शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते.

शंभरावं वर्ष लागतंय. पण मी खरंतर वेगळं असं काही केलं नाही. मला कसलंही व्यसन नाही इतकंच. आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही. पण जर अजून दोन ते तीन वर्षे मिळाली तर इतकंच मागतो की मला आजारी पडू देऊ नकोस. पुढील आयुष्य मिळालं तर छान हसत, खेळतं स्वावलंबी जीवन मिळावं....अशी भावना पुरंदरे यांनी व्यक्त केली.

कोथरूड येथे मुलाच्या घरी बाबासाहेब वास्तव्यास आहेत. वयाची ८० वर्षे शिवचरित्राचा ध्यास घेत तब्बल ५ लाख किलोमीटरचा प्रवास, राजा शिवछत्रपती ग्रंथाच्या १७ आवृत्या, जगभरात २५ हजार व्याख्याने असा थक्क करणारा प्रवास करीत हे शिवशाहीर गुरूवारी (दि. २९) वयाची ९९ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी संवाद साधला. स्पाँडिलायसिसचा त्रास जाणवू लागल्यामुळे ते झोपूनच होते. कुणालाही निराश न करता प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करीत उत्साहाने सर्वांना सामोरे जाणारे बाबासाहेब आज काहीसे हळवे झाले होते... मला अधिक बोलता येत नाहीये त्याबद्दल माफ करा... हे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले... १९४० साली सायकलवरून पडल्यानंतर स्पाँडिलायसिसचा त्रास सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

आयुष्यात मिळालेले आई-वडील आणि शिक्षकांचे संस्कार कधीही विसरणार नाही. वडिलांचं नेहमी सांगण होतं की ‘बाबासाहेब माणसानं नेहमी समजून वागावं’. ती समजूत आपलीच आपल्याला घ्यायची आहे. ती कुणी आयती आणून देणार नाही. ‘जे शिकवतात ते गुरू’. ते जे शिकवतात ते मनापासून शिकलं पाहिजे. आईवडिलांबददल आदरभावना ठेवली पाहिजे. जे आपल्यासाठी इतकं करतात त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो. आईवडिलांशी फक्त गोड बोला ते तुम्हाला उदंड आशीर्वाद देतील. कोणाचाही अपमान, द्वेष करू नका असं वडिलांनी शिकवलं... त्यांनी दिलेली शिकवण कधीही विसरलो नसल्याचे ते म्हणाले.

----------------------------------------------------------------------------------------------------------

‘वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे. पण समाधानी आणि तृप्त नाही. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहायची इच्छा आहे. सर्वांना रायगडावर घेऊन जायचे आहे. - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

----------------------------------------------------------------------------------------------------------------------