आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:25 IST2025-06-14T13:25:24+5:302025-06-14T13:25:43+5:30
पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असता अजित पवारांनी त्यांना आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकाराच्या वतीने करू असे आश्वासन दिले

आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार
पुणे : आम्हालाही शेकतकऱ्यांची चिंता आहे. कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. त्यावेळी बावनकुळे यांनी स्वतः त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. त्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. आता राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकारच्या वतीने करू असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.
पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. सरकार अजूनही त्यांच्या उपोषणाची दखल घेत नाही. असे म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. महिला कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमस्थळी गोंधळ घातल्याचे दिसून आले. पोलिसांनी सर्वांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आले. काही वेळ पोलीस आणि कार्यकर्यांमध्ये झटपट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ; अजितदादांनी दिले आश्वासन... #Pune#ajitpawar#ncp#bachhukadupic.twitter.com/nIPFDvjIAj
— Lokmat (@lokmat) June 14, 2025
अजितदादांचा कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न
अचानक कार्यक्रम सुरु असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यानी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बच्चू कडू अमरावतीला उपोषणला बसले आहेत. तरीही सरकार दखल घेत नाही. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कार्यक्रम थांबवला होता. अखेर अजितदादांनी कार्यक्रमातच त्यांनी आश्वासन देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला.