शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पुणे विभाग गाठणार टँकरची शंभरी, दुष्काळाच्या झळा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 7:01 PM

विभागातील १ लाख ७६ हजार १०३ नागरिक दुष्काळाने बाधित झाले असून जिल्हा प्रशासनाकडून १७ तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा वाढल्या;साता-यात ३९,पुण्यात ३०, सांगलीत १७ टँकर सध्या ९३ गावे आणि ६३८ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा

पुणे: पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे विभागात सध्या ९१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.विभागातील १ लाख ७६ हजार १०३ नागरिक दुष्काळाने बाधित झाले असून जिल्हा प्रशासनाकडून १७ तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार असल्याने लवकरच पुणे विभाग टँकरची शंभरी गाठेल,अशी शक्यता विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिका-यांकडून व्यक्त केली जात आहे.सप्टेबर महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यानंतर सुमारे महिन्याभरापूर्वी काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.त्यामुळे पुणे विभागातील सातारा,सांगली,पुणे व सोलापूर या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे.विभागात ४ डिसेंबर रोजी ७४ टँकर सुरू होते तर ५ डिसेंबर रोजी टँकरची संख्या ८५ वर गेली.गुरूवारी (दि.6) विभागात ९१ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.सध्या ९३ गावे आणि ६३८ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात माणमध्ये ३१,खटावमध्ये ५ तर कोरेगावमध्ये १ आणि फलटण येथे २ टँकर सुरू आहेत.तर पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये १० आणि शिरूरमध्ये ८ टँकर सुरू असून दोन दिवसांपूर्वी दौंड तालुक्यात ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत. तसेच पुरंदर व जुन्नरमध्ये प्रत्येकी २ आणि आंबेगावमध्ये १ असे एकूण ३० टँकर सुरू आहेत.त्याचप्रमाणे सांगलीत खाणापूर येथे ३ आटपाडीत ७ जतमध्ये ४,कवठे महांकाळ येथे २ आणि तासगाव येथे १ टँकर सुरू आहे.तसेच सोलापूरात माढा येथे ३ आणि करमाळ्यात २ टँकर चालू आहेत. 

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळWaterपाणीSatara areaसातारा परिसरSolapurसोलापूरSangliसांगली