शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी योजना’ सौरऊर्जेवर करणार

By admin | Updated: March 29, 2017 00:10 IST

थकीत वीजबिलामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

डोर्लेवाडी : थकीत वीजबिलामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. बिलाबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल. तसेच बारामती तालुक्यातील योजना सौरऊर्जेवर करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.बारामती तालुक्यातील ६८ व इंदापूर तालुक्यातील १०७ पाणीपुरवठा योजनांचे कनेक्शन महावितरणने बंद केले होते. यामुळे जवळपास दोन्ही तालुक्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा थांबला होता. त्यामुळे बारामती तालुक्यातील मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष गौतम थोरात, सचिव सोमनाथ भिले, सदस्य कांतीलाल काळकुटे, अर्जुन झगडे, दत्तात्रय भिसे, हनुमंत देवकाते, सचिन निलाखे, दादा गोफने यांच्यासह बारामती नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक विष्णुपंत चौधर, नाना सातव ,युवराज देवकाते यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री गिरीश बापट यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी त्यांनी पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल टप्प्याटप्याने भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी केली.बापट यांनी मेखळी, सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या शिष्टमंडळाबरोबर योजनांची बिले भरण्याकामी येत असलेल्या अडीअडचणींबाबत सखोल चर्चा केली. तसेच या संस्थांच्या वीजबिलावर कायमचा तोडगा काढण्यासाठी आगामी काळात ही पाणीपुरवठा योजना बारामती येथील कंपनींच्या सी.एस.आर. फंडातून सौरऊर्जेवर करण्याबाबत पडताळणी करण्याचे आश्वासन दिले. थकीत सार्वजनिक पाणीपुरवठा व उच्चदाब उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडीत झालेल्या जवळपास सर्वच संस्थांनी मूळ थकबाकीपैकी २० टक्के रक्कम व चालू महिन्याचे पूर्ण वीजबिल भरले. त्यामुळे या सर्व योजनांचा वीजपुरवठा गेल्या आठवड्यात पूर्ववत करण्यात आला आहे. परिणामी पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)२0 टक्के रक्कम : वीज पूर्ववतबारामती व इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ऐन टंचाईच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक संस्था एकरकमी थकीत बिलाची परतफेड करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती या शिष्टमंडळाने बावनकुळे व बापट यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे चालू महिन्याचे पूर्ण बिल तसेच व्याज व दंडाची रक्कम सोडून असणाऱ्या मूळ थकबाकीची २० टक्के रक्कम दर महिन्याला थकीत संस्थेने अदा करावी. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.