शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या प्रवाहाने रस्ता गेला वाहून

By admin | Updated: October 7, 2016 03:40 IST

कुरकुंभ व परिसरातील भागात झालेल्या पावसाने कुरकुंभ येथील ओढ्यात पाण्याच्या प्रमाणात चांगल्या प्रकारे वाढ झाली, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ओढा खोलीकरणामुळे

कुरकुंभ : कुरकुंभ व परिसरातील भागात झालेल्या पावसाने कुरकुंभ येथील ओढ्यात पाण्याच्या प्रमाणात चांगल्या प्रकारे वाढ झाली, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ओढा खोलीकरणामुळे पाण्याची साठवणूकसुद्धा झाली. परिणामी, शेतकऱ्यांना याचा उपयोग होत आहे. मात्र या पाण्याच्या प्रवाहाने पाणंद रस्त्यावरील मातीचा भराव वाहून गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.कुरकुंभ येथील गिरमे वस्ती व जाधव वस्ती या परिसरात असणाऱ्या ओढ्यावरील मातीचा भराव वाहून गेला; परिणामी या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना यातूनच मार्ग काढत शेतीची कामे करावी लागतात. मात्र, अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढणे अत्यंत जिकिरीचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत; तसेच ग्रामपंचायतीकडे याबाबत तोंडी चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, शेतात जाण्यासाठी रात्री -अपरात्री या रस्त्याचा वापर करताना ओढ्यापलीकडे राहणारे नागरिक, विद्यार्थी, तसेच शेतकरी यामधून मार्ग काढण्याची मागणी करीत आहेत.ओढा खोलीकरणामुळे पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा झाल्यामुळे परिसरातील विहिरी व शेतीसाठी याचा फायदा झाला; मात्र या झालेल्या कामाबाबतदेखील आक्षेप घेण्यात आला. काम झाल्यानंतर याची बिले काढण्यासाठी हेच लोक विरोध करीत आहेत व परत कामे करीत नाही, असा आरोप करतात. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी कामे करताना अडवणूक करण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. दरम्यान, वाहून गेलेल्या रस्त्याचे काम लवकर करण्याचा प्रयत्न केला जाईल .- जयश्री भागवत, सरपंच कुरकुंभ४या परिसरातील रस्ता वाहून गेला असल्यामुळे नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय झालेली आहे. त्याचप्रमाणे या भागातून वाहतूक करणे, तसेच ये-जा करणेही जिकिरीचे झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडूनच तातडीने पावले उचलून हा रस्ता नव्याने तयार व्हावा, अशी सर्वांचीच मागणी आहे. ४एका बाजूला झालेल्या चांगल्या कामांविषयी शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. परंतु, दैनंदिन गरजेचा रस्ताच नसेल, तर अनेक कामे अडून राहतात. यामुळे लवकरात लवकर रस्ता व्हावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. प्रशासनाने लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.