शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

VIDEO : भोरड्यांची माळ फुले! पक्षांचा मुक्त संचार पाहून हरखून गेले पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 10:30 PM

बारामती तालुक्यातील मुढाळे गावात भोरड्या  पक्ष्यांचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.  हर्रर्र हुश हरर्र भोरडी ...अशी हाक देउन  भोरड्यांचे नृत्य पाहुन हरखुन गेलेले पर्यटक त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुणे  - बारामती तालुक्यातील मुढाळे गावात भोरड्या  पक्ष्यांचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.  हर्रर्र हुश हरर्र भोरडी ...अशी हाक देउन  भोरड्यांचे नृत्य पाहुन हरखुन गेलेले पर्यटक त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.भोरड्यांचे नृत्याचे राज्यासह देशातील पर्यटकांना आकर्र्षण आहे. त्याला अभिनेते देखील अपवाद नाहित. सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी कुटुंबियांसह शनिवारी (दि १०) भोरड्यांचे नृत्य पाहण्याचा आनंद लुटला. संध्याकाळच्या वेळेत आकाशात मोठ्या संखेने  भोरड्या एकत्रित येतात. एकत्र झालेल्या भोरड्या हळूहळू विविध कसरती, नृत्य, एरो मोडलिंग करायला सुरुवात करतात. हा नृत्य प्रकार साधारणपणे तासभर सुरु असतो. १ लाखांपेक्षा जास्त भोरड्या एकत्रित नृत्य करताना पाहण्याचा आनंद  अवर्णनीय असल्याचे येथील पर्यटक सांगतात. काही स्थानिक पक्षी  कावळे, घारी, बगळे यांच्या मध्ये येणाया प्रयत्न करतात. मात्र यांच्या कवायती मध्ये कसलाच खंड पडत नाही हे विशेष. भोरड्या जे नृत्य करतात याला इंग्रजी मध्ये ‘मुरमुरेशन’ म्हणतात. पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी ‘लोकमत’ शी बोेलताना सांगितले की, पूर्व युरोप , रशिया, फिनलंड, सिंध प्रांत या भागातून भोरड्या लाखोंच्या संखेने भारतात महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, तेल्लांगना, कर्नाटक, आंध्र, गुजरात, राजस्थान सह दरवर्षी येत असतात. अगदी जुलै पासून भारतात यायला सुरुवात होते. मात्र, महाराष्ट्रात अगदी उशिरा नोव्हेंबर मध्ये यायला सुरुवात होते. या भोरड्या हिमालयाच्या शिखराणा पार करून येत असतात. साधारणपणे स्थलांतर करण्यापूर्वी त्यांचा विणीचा हंगाम संपलेला असतो. थंडी पडायला सुरुवात झालेली असते.मग पिलांना खाद्य अपुरे पडू लागते .कारण हजारोंच्या संख्येने असल्यामुळे खाद्य कमी पडू लागते. शिवाय यांच्या मूळ भागात कडाक्याची थंडी पडू लागल्याने खाद्य कमी होत असते .परिणाम काहीना खाद्यही मिळत नाही परिणाम मृतू होत असतात. आणि मग स्थलांतर करायला सुरुवात करतात. यात काही जुने नर व माद्या आणि त्यांच्याबरोबर नवीन तयार झालेली पिढी निघते जवळपास २०००० किमी चा प्रवास करायला. मग एकट्याने प्रवास केला तर उर्जा जास्त लागेल, म्हणून एकत्रित प्रवास करून उर्जा बचत आणि जास्त प्रवास केला जातो. यात यु इंग्रजी आकार करून हवेतील प्रवास केल्यास उर्जा बचत होते. एका पंखाला आराम मिळतो.  हवेचा वेग कमी होतो आणि वेगही वाढतो.  त्यांंच्या खाद्यात जवळपास ९७ टक्के कीटक असून ३ टक्के एवढेच फळ, बिया यांचा समावेश आहे.गवतातील नाकतोडे, टोळधाड, अनेक कीटकांच्या आळयाचा समवेश असतो.सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्यात कीटकांचे मिलन आणि आळी अवस्था असताना या भोरड्या प्रवेश करतात .त्यामुळे मोठ्या प्रमाणात कीडनियंत्रण केली जाते. यामुळे यांचा आपल्या भागातील ज्वारीचे पिक मोठे होण्यासाठी मदत होत असते. म्हणून थोडी ज्वारी खाल्ली तरीदेखील यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.एक भोरडी एक दिवसात २०० ग्राम पेक्षा जास्त कीटक खात असते. यात कीटकांच्या अळ्याचे प्रमाणत जास्त असते. त्यामुळे कीडनियंत्रन मोठ्या प्रमणात केले जाते. अनेक झाडांचे परागीभवन करणेसाठी मोठ्या प्रमाणात मदतही करीत असतात, यात पळस, पांगारा, वड, उंबर, गवताच्या बियासह अश्या अनेक झाडांच्या बिया खाऊन बीज प्रसारक म्हणून काम करीत आहेत. हे पक्षी वसाहत म्हणजे राहण्याचे ठिकाण दरवर्षी बदलत असतात. यावर्षी तलाव, तर कधी काटेरी साधी बाभूळ वने, तर कधी उसाचे पिक, तारा अश्या विविध ठिकाणी त्यांचे अधिवास आढळून येतात. यांच्या वसाहतीला अजिबात त्रास देऊ नये. या पक्ष्यांना कोणी उपद्रव करीत असल्यास  वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटनMaharashtraमहाराष्ट्र