शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

Unseasonal rain: १ लाख १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनामे सुरू, सर्वाधिक फटका नाशिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:48 IST

पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पुणे : राज्यात मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे २८ जिल्ह्यांतील तब्बल सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील काढणीला आलेल्या रब्बी तसेच भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टरवर झाले आहे. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, याबाबतचा अहवाल लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

राज्यात १६ ते १९ तसेच २६ ते ३१ मार्चपर्यंत अवकाळी तसेच गारपिटीचा तडाखा बसला. या पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी या महत्त्वाच्या रब्बी पिकांसह कांदा, मका, भाजीपाला, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, आंबा, भुईमूग, कलिंगड, पेरू, बाजरी, तीळ यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. कृषी विभागाने केलेल्या नजरअंदाज अहवालानुसार राज्यात आतापर्यंत १ लाख १९ हजार ३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात २९ हजार ८११ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्याखालोखाल नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यात २३ हजार ६३२, जळगाव जिल्ह्यात २० हजार ६१३, धुळे जिल्ह्यात १४ हजार ८३१, बुलढाणा जिल्ह्यात ८ हजार ५०७, संभाजीनगर जिल्ह्यात ८ हजार ४४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसदेखील राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पिकांचे आणखी नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी सुरू केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

---------

जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

कोल्हापूर १५.९०

सातारा १५०.१०

सांगली १८६५.४२

नागपूर ४१.१७

भंडारा ९८.३०

चंद्रपूर १९८.३०

गोंदिया ३२.५०

गडचिरोली ३५७.१५

लातूर २०३.१०

नांदेड ५०२.३२

धाराशिव १४०७.४०

अमरावती ६९५.८६

अकोला ९३०.६४

वाशिम १२०.१०

बुलढाणा ८५०७.१५

यवतमाळ १९०.९०

पुणे १७८५.४०

सोलापूर २४३९.०५

अहिल्यानगर २३६३२.९०

नाशिक २९८११.७०

धुळे १४८३१.५०

नंदूरबार २९१.७६

जळगाव २०६३१

संभाजीनगर ८४४५.१०

जालना १६९२

बीड ४५२.८०

रत्नागिरी ६०.०२

सिंधुदुर्ग १.५३

एकूण ११९३७३.०७

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Damage in Maharashtra: Lakh Hectares Affected, Nashik Hit Hardest

Web Summary : Unseasonal rains and hailstorms damaged crops across 28 districts of Maharashtra, impacting over 1.19 lakh hectares. Nashik is the worst-hit district, with nearly 30,000 hectares affected. More rain is expected, adding to farmers' worries.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस