शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जावे; अजित पवारांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 15:20 IST

आम्हाला आशा आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवता निश्चित या प्रकरणात योग्य तो न्याय करेल

बारामती : निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये जावे. त्या ठिकाणी न्याय मागावा. आम्हाला आशा आहे की न्यायदेवता निश्चित या प्रकरणात योग्य तो न्याय करेल, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

बारामती येथे रविवारी( दि. १९) विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी आढावा बैठक देखील घेतली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार पुढे म्हणाले, हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक निवडणुका लढवल्या. अनेकांना त्यांनी आमदार, खासदार केले मंत्री केले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर मित्र पक्ष आहेत. महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही एकोप्यानेच काम करतो. जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतो.

दोन हजार कोटी रुपये घेऊन निवडणूक आयोगाने चिन्ह व पक्षाचे नाव शिंदे गटाला दिले असा आरोप नुकताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता, याबाबत माध्यमांनी पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी याबाबत अज्ञानी आहे. मला हे माहिती नाही. मात्र एक जबाबदार खासदार अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर सभागृहामध्ये आम्ही आमदार व खासदार काही भूमिका मांडली तर ते खरं समजून पुढे जायचे असते असा सभागृहाचा नियम आहे. कोणीही काहीही आरोप केले तरी त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. त्यांच्या आरोपाला देखील आम्ही फारसे महत्त्व देत नाही. पवार साहेब कृषी मंत्री असताना हीच खासदार मंडळी आपली वेगवेगळी कामे घेऊन साहेबांकडे जात होती. अनेक कामे मार्गदेखील लावत होते. महाराष्ट्रातील खासदारांना दिल्लीमध्ये साहेबांचा आधार वाटत होता. त्या काळातील यांची वक्तव्य काढून जर पाहिली तर तुम्हाला कळेल ते काय म्हणत होते. सध्या राजकीय चित्र बदलले असल्यामुळे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, अशा शब्दात खासदार प्रताप जाधव यांच्या शरद पवार यांच्यावरील टीकेला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उत्तर दिले. 

सरकार शिवस्मारकाच्या कामाकडे जेवढ्या गांभीर्याने लक्ष देत नाही 

सगळ्या परवानग्या न घेता अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे अनेक विषय निर्माण झाले. त्या सर्व अडचणींचे निरसन अद्यापही झाले नाही. हे सरकार शिवस्मारकाच्या कामाकडे जेवढ्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे तेवढे दिले जात नाही. शिवस्मारक त्याच ठिकाणी व्हावे की इतर ठिकाणी याबद्दल मी वाद होऊ शकतात अनेकजण याबाबत वेगवेगळी मत मतांतरे व्यक्त करत आहेत. मात्र मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वोच्च स्मारक तयार झाले. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक कीर्तीचे स्मारक लवकरात लवकर तयार व्हावे अशी शिवप्रेमींची भावना आहे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस