शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

टिळकांची ‘ती’ खंत आजही कायम : डॉ. नितीन करमळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 5:54 PM

चांगले शिक्षक दुर्मीळ होत असल्याबाबत टिळकांनी अग्रलेख लिहिला होता.

ठळक मुद्दे‘अग्रलेखकार लोकमान्य टिळक’ या पुस्तकाचे प्रकाशनइतर काही होता येत नाही, मग निदान शिक्षक तरी व्हा, अशा विचाराने तरूण शिक्षकी पेशाकडे

पुणे : ‘चांगले शिक्षक मिळणे दुर्मीळ झाल्याची खंत लोकमान्य टिळक यांनी व्यक्त केली होती. दुर्दैवाने हीच परिस्थिती आजही कायम आहे. आजही चांगले शिक्षक अभावानेच दिसतात. ’, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.उत्कर्ष प्रकाशनतर्फे डॉ. विश्वास मेहंदळे लिखित ‘अग्रलेखकार लोकमान्य टिळक’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले. या वेळी प्रा. डॉ. करमळकर, ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रकाशक सु.वा. जोशी उपस्थित होते.करमळकर म्हणाले,‘लोकमान्य टिळकांनी राजकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, कृषी अशा विविध विषयांवर अग्रलेख लिहिले. त्यांचे महत्त्व कालातीत आहे. ते विचार आजही लागू होतात. चांगले शिक्षक दुर्मीळ होत असल्याबाबत टिळकांनी अग्रलेख लिहिला होता. इतर काही होता येत नाही, मग निदान शिक्षक तरी व्हा, अशा विचाराने तरूण शिक्षकी पेशाकडे वळत आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे’, असे प्रा. डॉ. करमळकर म्हणाले.डॉ. मुजूमदार म्हणाले, ‘पूर्वी शिक्षक हे समाजाचा नेते असत. सामाजिक जडणघडणीत शिक्षकी पेशाचे मोठे योगदान होते. आता अगदी विरूद्ध परिस्थिती आहे. रोजगाराभिमुख शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्यविकास, शैक्षणिक आदानप्रदान आदी बाबतीत लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार आजही खरे ठरतात.’अ‍ॅड. आव्हाड म्हणाले, ‘सध्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, यापेक्षा जनतेचे डोके ठिकाणावर आहे का हे विचारण्याची गरज आहे. राज्यघटनेने दिलेले अधिकार नागरिकांनी वापरले तर लोकशाही सशक्त होईल.समाजात गुणग्राहकतेची गरज असून चांगले नेतृत्व निवडणेही गरजेचे आहे.’ ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही असे टिळकांचे अनेक अग्रलेख आजही तंतोतंत लागू पडतात. टिळक की आगरकर हा वाद ब-याचदा दिसतो. परंतु, समाजाच्या उन्नतीसाठी टिळक आणि आगरकर हे धोरण अधिक योग्य ठरेल’, असे मेहंदळे म्हणाले. सुधाकर जोशी यांनी प्रास्तविक केले. समीरण वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकS B Mujumdarशां. ब. मुजुमदारnitin karmalkarनितीन करमळकरTeacherशिक्षक