शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाकाळात मृत्यू नाहीतर हत्या झाल्यात : भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद यांचा गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 22:51 IST

उत्तर प्रदेश सरकारने कोरोना काळात मृतांची आकडेवारी लपवली..

पुणे : उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात लाखो लोकांचे जीव गेले. सरकारने ठरविले असते तर त्यांचा जीव वाचवता येणे शक्य झाले असते. मात्र, तसे न करता तेथील सरकारकडून मृत्यूची आकडेवारी लपविण्यात आली. मात्र, ज्यावेळी नागरिकांचे मृतदेह गंगेत तरंगत आले ते स्वतःसाठी न्याय मागत होते. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात जे मृत्यू झाले ते मृत्यू नाहीतर हत्या आहे असा गंभीर आरोप भीम आर्मीचे आणि आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांनी करतानाच योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.

भीम आर्मीचे आणि आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, प्रदेश प्रमुख प्रफुल शेंडे, राहुल प्रधान, नेहा शिंदे, राजेश गवळी आदी उपस्थित होते.

आजाद म्हणाले, कोरोना परिस्थितीवर काम करण्यापॆक्षा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू अशा राज्यात प्रचाराला गेले. एवढाच फिरण्याचा शौक असेल तर मुख्यमंत्रीपदावर दुसरा व्यक्ती बसवायला हवा. तसेच यावेळी त्यांनी जोपर्यंत उपेक्षितांची सत्ता येत नाही तोपर्यंत त्यांच्या अधिकारांचे हनन आणि हक्क चिरडले जाणार. पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणे हे राजर्षी शाहू महाराजांच्या वैचारिक वारसांना शोभणारे नाही. या हक्कासाठी येत्या काळात येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या निवासाला घेराव घालणार असून प्रसंगी महाराष्ट्र बंद करू असा इशारा देखील दिला आहे. 

अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी यांना राज्य घटनेच्या कलम १६ (४) अ नुसार पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. राज्य सरकार हे आरक्षण देऊ शकते हे सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलेले आहे. परंतु, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत वैचारिक वारसदार म्हणवणाऱ्यांकडून उपेक्षित समाजाची फसवणूक केली जात आहे. सरकारने गैरसमाजात राहू नये. आरक्षण मिळविण्याकरिता तीव्र आंदोलन उभे केले जाईल असे आजाद म्हणाले. 

मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पूर्ण पाठींबा आहे. लोकसंख्येनुसार प्रत्येक समाजाला त्या प्रमाणात आरक्षण द्यायला हवे. त्यामुळे १०० टक्के आरक्षण लागू करावे असे आजाद म्हणाले. अनुसूचित जाती-जमाती यांनी खुल्या वर्गातून सर्व जागांवर निवडणुका लढविल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी सुद्धा आपले खरे प्रतिनिधी निवडून सभागृहात पाठवावेत. सध्या देशात अघोषित आणीबाणी असून अधिकारांचे दमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Azadचंद्रशेखर आझादUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू