पुणे: ‘भीमाशंकर अभयारण्याचे राष्ट्रीय उद्यानात रूपांतर केल्यास त्या परिसरातील गावांचे स्थलांतर करावे लागेल, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे भीमाशंकर अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याबाबत कोणताही प्रस्ताव सध्या राज्य सरकारच्या विचाराधीन नाही,’ अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.
भीमाशंकर अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याबाबत आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्याबाबत वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, ‘भीमाशंकर अभयारण्य परिसरात बिबटे, लांडगे, कोल्हे, तरस, हरीण तसेच राज्यप्राणी शेकरू यासारख्या विविध वन्यजीवांचा अधिवास असून, त्यांच्या संवर्धनासाठी वनसंपदा वाढवण्यावर सरकारचा भर राहील. संबंधित भागातील लोकप्रतिनिधींनी स्थानिक गावांच्या समस्या व परिस्थितीचा सखोल अभ्यास करून मागणी केल्यास सरकार त्यावर विचार करेल.’
Web Summary : Forest Minister clarifies no proposal to declare Bhimashankar a national park exists. Relocation concerns for locals drive the decision. Focus remains on conserving wildlife and forests.
Web Summary : वन मंत्री ने स्पष्ट किया कि भीमाशंकर को राष्ट्रीय उद्यान घोषित करने का कोई प्रस्ताव नहीं है। स्थानीय लोगों के पुनर्वास की चिंता निर्णय का कारण है। वन्यजीवों और जंगलों के संरक्षण पर ध्यान केंद्रित है।