शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक निवडून येण्यामागे विकासाचे गमक नाही; पुण्यातही ठेकेदार, खंडणी कोट्यवधींच्या पैशाचे राजकारण - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 20:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापूर्वी एक विधान केले होते की, महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील. त्या गर्जनेचे काय झाले?

पुणे: पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येण्यामागे कोणतेही विकासाचे गमक नाही, पुण्यातही काळा पैसा, ठेकेदार, खंडणीचा कोट्यवधींच्या पैशाचे राजकारण असल्याची टिका उध्दवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी भाजपने काय तीर मारला ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुणे महापालिकेतील उध्दवसेनेच्या पक्ष कार्यालयाला खासदार संजय राऊत यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, गटनेते नितीन गावडे, वसंत मोरे, संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रशांत बधे उपस्थित होते. त्यावेळी राउत बाेलत होते.

महापौर बंगल्यातील २० झाडांची कत्तलीवर खासदार संजय राऊत म्हणाले, झाडांची कत्तल हा फक्त पुण्याचा विषय नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचा विषय आहे.  मुंबईतील आरेचे जंगल, ज्याला मुंबईचे फुफ्फुस म्हटले जाते, तिथे मेट्रोच्या नावाखाली एका रात्रीत २४०० झाडे तोडली गेली. उध्दवसेनेनेआंदोलन केले, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केले, पण काय झाले? नाशिकच्या तपोवनात कुंभाच्या नावाखाली झाडे तोडली गेली. जोपर्यंत नागरिक जागृत होत नाहीत, तोपर्यंत सत्ताधार्यांची ही भूमिका अशीच राहील.

खासदार संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापूर्वी एक विधान केले होते की, महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील. तेव्हा आम्ही टाळ्या वाजवल्या होत्या. मग आता त्या गर्जनेचे काय झाले? महाराष्ट्राच्या राजधानीत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी यावे, ही भूमिका अतिरेक कशी असू शकते? मुंबईत मराठी बोलणे हा अतिरेक वाटत असेल, तर हे सरकार मराठीच्या संवर्धनासाठी गंभीर नाही. त्यांना मुंबई केंद्रशासित करायची आहे, त्या दिशेने पडलेली ही पावले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भगतसिंह कोश्यारींपासून ते बागेश्वर बाबांपर्यंत अनेकजण वादग्रस्त विधाने करत आहेत यावर खासदार संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ही लोकं जी विधाने करतात, त्याचे समर्थन मुख्यमंत्री करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवाजी महाराज हे राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहेत. महाराजांचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही, असा घाणाघात त्यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस