शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगाची स्थिती अत्यंत चिंताजनक; शेतकरीही संकटात, शरद पवारांचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:05 IST

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, ही स्थिती चांगली नाही

बारामती: महाराष्ट्र मध्ये पुन्हा आत्महत्या वाढल्या आहेत. ही स्थिती चांगली नाही, साखर उद्योगाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ही परिस्थिती सुधारण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, त्यांचं मात्र याकडे किती लक्ष आहे याबाबत माझ्या मनात शंका आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ही  स्थिती चांगली नाही, शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

बारामती येथे एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि ‘विस्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वी प्रयोग या विषयावर आयोजित ऊस परिषदेत पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले, राज्यात ‘एआय’ तंत्रज्ञान चमत्कार करू शकते. यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सर्व संस्थानी एकत्र बसून राज्यभर एक कार्यक्रम घेण्याची पावलं टाकल्यास ४ ते ४ वर्षात राज्यात ऊस उत्पादनात क्रांती होईल. ऊसाप्रमाणे इतर पिकात देखील ‘एआय’ शेती अर्थव्यवस`था बदलेल. परिणामी देशाची राज्याची अर्थव्यवस्था बदलायला यातून मदत होईल. देशामध्ये साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी या उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये सध्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. शेती क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनात वाढ होत आहे. यामध्ये ऊस उत्पादनात आर्टिफिशियल ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढीचा प्रयोग बारामती कृषी विज्ञान केंद्रात यशस्वी झाला आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे पवार म्हणाले. 

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणाऱ्या तंत्रज्ञानावर ‘केव्हीके’ चा पुढकार अभिमानास्पद आहे. शेतकऱ्यांचे ठीबक सिंचनाने थकीत ५०० कोटींचे अनुदान वेळेवर मिळणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी नमुद केले. यावेळी ‘बिस्मा’चे अध्यक्ष बी.बी ठोंबरे यांनी ऊस विकासाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. तंत्रज्ञान वापराचे नियोजन केल्यास साखर उद्योगाचे चित्र बदलण्याची खात्री असल्याचे ठोंबरे म्हणाले. यावेळी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी ‘एआय’चा ‘केव्हीके’ मध्ये सुरु असलेल्या प्रयोगाचा आढावा घेत एआय तंत्रज्ञानाचे कृषि क्षेत्रातील महत्व विषद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यांनी या तंत्रज्ञान वापराचे ‘प्रेझेंटेशन’ सादर केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी ऊस उत्पादनामध्ये ए आय तंत्रज्ञान महत्वपूर्ण ठरेल. हे काम बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे. याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. "विस्मा" चे अध्यक्ष बी. ठोंबरे यांनी आपल्या भाषणात साखर उद्योगापुढील अडचणी सांगत ए.आय तंत्रज्ञान ऊस उत्पादकांना फायदेशीर ठरणारे असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय साखर संघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेMONEYपैसाFarmerशेतकरी