शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:20 IST

ईवाय कंपनीत तरुणी ऑडिट आणि ॲश्युरन्स विभागात नोकरी करत असून तिच्यावर कायम कामाचा लोड टाकला जायचा, तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला एका कामासाठी रात्री बोलावले होते

पुणे : पुण्यातील ईवाय (Ernst & Young (EY) या प्रतिष्ठित कंपनीत काम करणाऱ्या अँना सेबॅस्टियन पेरायल या २६ वर्षीय तरुणीचा नोकरी लागल्यानंतर केवळ चार महिन्यांतच कामाच्या ताणतणावामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिची आई अनिता ऑगस्टीन यांनी केला आहे. त्यांनी थेट ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना पत्र लिहिल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. ‘मी माझे मौल्यवान मूल गमावले आहे. हे शब्द लिहिताना माझे हृदय जड झाले आहे. आम्हाला जे दुःख झाले आहे ते इतर कोणत्याही कुटुंबाला सहन करावे लागू नये. कंपनीने मुलीकडून थकवा येण्यापर्यंत जास्त काम करवून घेतले असल्याचा आरोपही त्यांनी पत्रात केला असून, घटनेच्या वेळी आणि नंतर कंपनीकडून पाठिंबा न मिळाल्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे.

राजीव मेमाणी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले, की नोव्हेंबर २०२३ मध्ये मुलीने सीए परीक्षा उत्तीर्ण केली आणि १९ मार्च २०२४ ला पुण्यातील ईवाय कंपनीत तिला ऑडिट आणि ॲश्युरन्स विभागात नोकरी मिळाली. तिने भविष्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. ही तिची पहिलीच नोकरी होती आणि प्रतिष्ठित कंपनीचा भाग झाल्याचा तिला आंनद झाला होता. मात्र, चार महिन्यांनंतर २० जुलैला जेव्हा मला तिचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली. तेव्हा माझे जग उद्ध्वस्त झाले. लहानपणापासून तिच्या शैक्षणिक वर्षांपर्यंत तिने उत्कृष्ट कामगिरी केली. ती शाळेमध्येच नव्हे तर कॉलेजमध्येही टॉपर होती. विविध कौशल्य देखील तिने आत्मसात केली होती. ईवाय कंपनीत रुजू झाल्यावर ती अथक परिश्रम करीत होती. कामाचा ताण, नवीन वातावरण आणि कामाच्या जादा तासांचा तिच्यावर शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम झाला. निद्रानाश आणि जॉइन झाल्यानंतर लगेचच तिला तणाव जाणवायला लागला. आम्ही तिच्या सीए दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी पुण्यात पोहोचलो. मात्र, रात्री उशिरा पीजीमध्ये पोहोचल्यावर छातीत दुखत असल्याची तिची तक्रार होती. आम्ही तिला पुण्यातील रुग्णालयात नेले. तिचा ईसीजी नॉर्मल होता. त्यातही तिचे म्हणणे होते की खूप काम करायचे आहे आणि तिला सुटी मिळणार नाही. तिच्यावर कायम कामाचा लोड टाकला जायचा. तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला एका कामासाठी रात्री बोलावले होते. अथक मागण्या आणि अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्याचा तिच्यावर दबाव होता. तिचा स्वभाव असा होता की व्यवस्थापकांना तिने कधीच दोष दिला नसता. त्यासाठी ती खूप दयाळू होती; पण मी राहू शकत नाही. शांत नवोदितांच्या पाठीवर कामाचा भार टाकणे, त्यांना रात्रंदिवस काम करायला लावणे, अगदी रविवारी, काहीही औचित्य नसताना कामावर बोलावणे चुकीचे आहे. तुम्ही नवीन कर्मचाऱ्यांचा थोडा विचार केला पाहिजे. ती नवीन होती याचा पुरेपूर फायदा व्यवस्थापनाने घेतला असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

आम्ही युवक काँग्रेस या नात्याने अँनासारख्या कुटुंबांसोबत एकजुटीने उभे आहोत, ज्यांचे जीवन चुकीच्या कार्यसंस्कृतीमुळे उद्ध्वस्त झाले आहे. कंपन्या तरुण व्यावसायिकांची ऊर्जा, उत्साह आणि स्वप्नांचा गैरफायदा घेत आहेत. कॉर्पोरेट दबाव, अवास्तव अपेक्षा यासाठी संस्थांना जबाबदार धरले पाहिजे, हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रत्येक ऑफिसमध्ये कामासाठी संतुलित वातावरण असावे. जोपर्यंत हे प्राधान्याने होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. - अक्षय जैन, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस (मीडिया आणि कम्युनिकेशन्स)

टॅग्स :PuneपुणेEmployeeकर्मचारीWomenमहिलाEducationशिक्षणMONEYपैसाPoliceपोलिसSocialसामाजिक