शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:20 IST

ईवाय कंपनीत तरुणी ऑडिट आणि ॲश्युरन्स विभागात नोकरी करत असून तिच्यावर कायम कामाचा लोड टाकला जायचा, तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला एका कामासाठी रात्री बोलावले होते

पुणे : पुण्यातील ईवाय (Ernst & Young (EY) या प्रतिष्ठित कंपनीत काम करणाऱ्या अँना सेबॅस्टियन पेरायल या २६ वर्षीय तरुणीचा नोकरी लागल्यानंतर केवळ चार महिन्यांतच कामाच्या ताणतणावामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिची आई अनिता ऑगस्टीन यांनी केला आहे. त्यांनी थेट ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना पत्र लिहिल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. ‘मी माझे मौल्यवान मूल गमावले आहे. हे शब्द लिहिताना माझे हृदय जड झाले आहे. आम्हाला जे दुःख झाले आहे ते इतर कोणत्याही कुटुंबाला सहन करावे लागू नये. कंपनीने मुलीकडून थकवा येण्यापर्यंत जास्त काम करवून घेतले असल्याचा आरोपही त्यांनी पत्रात केला असून, घटनेच्या वेळी आणि नंतर कंपनीकडून पाठिंबा न मिळाल्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे.

राजीव मेमाणी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले, की नोव्हेंबर २०२३ मध्ये मुलीने सीए परीक्षा उत्तीर्ण केली आणि १९ मार्च २०२४ ला पुण्यातील ईवाय कंपनीत तिला ऑडिट आणि ॲश्युरन्स विभागात नोकरी मिळाली. तिने भविष्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. ही तिची पहिलीच नोकरी होती आणि प्रतिष्ठित कंपनीचा भाग झाल्याचा तिला आंनद झाला होता. मात्र, चार महिन्यांनंतर २० जुलैला जेव्हा मला तिचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली. तेव्हा माझे जग उद्ध्वस्त झाले. लहानपणापासून तिच्या शैक्षणिक वर्षांपर्यंत तिने उत्कृष्ट कामगिरी केली. ती शाळेमध्येच नव्हे तर कॉलेजमध्येही टॉपर होती. विविध कौशल्य देखील तिने आत्मसात केली होती. ईवाय कंपनीत रुजू झाल्यावर ती अथक परिश्रम करीत होती. कामाचा ताण, नवीन वातावरण आणि कामाच्या जादा तासांचा तिच्यावर शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम झाला. निद्रानाश आणि जॉइन झाल्यानंतर लगेचच तिला तणाव जाणवायला लागला. आम्ही तिच्या सीए दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी पुण्यात पोहोचलो. मात्र, रात्री उशिरा पीजीमध्ये पोहोचल्यावर छातीत दुखत असल्याची तिची तक्रार होती. आम्ही तिला पुण्यातील रुग्णालयात नेले. तिचा ईसीजी नॉर्मल होता. त्यातही तिचे म्हणणे होते की खूप काम करायचे आहे आणि तिला सुटी मिळणार नाही. तिच्यावर कायम कामाचा लोड टाकला जायचा. तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला एका कामासाठी रात्री बोलावले होते. अथक मागण्या आणि अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्याचा तिच्यावर दबाव होता. तिचा स्वभाव असा होता की व्यवस्थापकांना तिने कधीच दोष दिला नसता. त्यासाठी ती खूप दयाळू होती; पण मी राहू शकत नाही. शांत नवोदितांच्या पाठीवर कामाचा भार टाकणे, त्यांना रात्रंदिवस काम करायला लावणे, अगदी रविवारी, काहीही औचित्य नसताना कामावर बोलावणे चुकीचे आहे. तुम्ही नवीन कर्मचाऱ्यांचा थोडा विचार केला पाहिजे. ती नवीन होती याचा पुरेपूर फायदा व्यवस्थापनाने घेतला असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

आम्ही युवक काँग्रेस या नात्याने अँनासारख्या कुटुंबांसोबत एकजुटीने उभे आहोत, ज्यांचे जीवन चुकीच्या कार्यसंस्कृतीमुळे उद्ध्वस्त झाले आहे. कंपन्या तरुण व्यावसायिकांची ऊर्जा, उत्साह आणि स्वप्नांचा गैरफायदा घेत आहेत. कॉर्पोरेट दबाव, अवास्तव अपेक्षा यासाठी संस्थांना जबाबदार धरले पाहिजे, हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रत्येक ऑफिसमध्ये कामासाठी संतुलित वातावरण असावे. जोपर्यंत हे प्राधान्याने होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. - अक्षय जैन, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस (मीडिया आणि कम्युनिकेशन्स)

टॅग्स :PuneपुणेEmployeeकर्मचारीWomenमहिलाEducationशिक्षणMONEYपैसाPoliceपोलिसSocialसामाजिक