शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

इंग्रजांनी व स्वकियांनी इतिहासातील नायकांवर अन्याय केला, तो डिलीट करण्यात आला - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपल्या नायकांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत,

पुणे : इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकियांनीही इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला. त्यांचा इतिहास डिलीट करण्याचे काम झाले. त्यामुळे मुघलांनंतर देशात इंग्रज आले, असे अनेकांना वाटते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपल्या नायकांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे साकारलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला एकत्र करून मुघल साम्राज्याच्या चारही आक्रमकांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी फुलविलेल्या स्वराज्याच्या अंगारामुळे अनेक पराक्रमी योद्धे तयार झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारीत करण्याचे काम श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. त्यांनी लढलेल्या ४१ लढायांपैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. वेग ही त्यांची सर्वांत मोठी रणनीती होती. युद्धासाठी मुघलांची सेना जेव्हा ८ ते १० कि. मी. प्रवास करत असे, तेव्हा बाजीरावांची सेना ६० ते ८० कि. मी.चा प्रवास दररोज करत असे. पालखेड येथे झालेल्या युद्धाचा उल्लेख रणनीतीनुसार सर्वांत चांगली लढाई होय, असा माँटगोमेरी यांच्यासारख्या सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्याचा गौरव केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणBJPभाजपाMahayutiमहायुती