शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस भात, भुईमुगाला तारणार

By admin | Updated: September 11, 2015 04:39 IST

जिल्ह्यात बुधवारी झालेला पाऊस भात व भुईमूग या पिकांसाठी, उशिरा लावलेल्या ज्वारीसाठी फायदेशीर ठरेल. रब्बीच्या पूर्व मशागतींसाठीही हा उपयुक्त आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे

पुणे : जिल्ह्यात बुधवारी झालेला पाऊस भात व भुईमूग या पिकांसाठी, उशिरा लावलेल्या ज्वारीसाठी फायदेशीर ठरेल. रब्बीच्या पूर्व मशागतींसाठीही हा उपयुक्त आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश धुमाळ यांनी आज दिली.धुमाळ म्हणाले, ‘‘खरिपाला फारसा फायदा होणार नाही. खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वाया गेला आहे. फक्त ३० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. सोयाबीनची लागवड अनेक पटींनी झाली होती. हे पीकही वाया गेले आहे. बाजरी काढणीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या पावसाचा भुईमूगपिकाला फायदा होऊ शकेल.’’भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने रोपांच्या वाढीसाठी फायदा होईल. भाताला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. खरिपापेक्षा रब्बीचा हंगाम मोठा असतो. या हंगामाच्या पूर्वमशागतींना वेग येऊन पेरण्या लवकर पूर्ण होऊ शकतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू दीर्घ काळानंतर सुरू झालेल्या पावसाने भीमा खोऱ्यातील सर्व २५ धरण प्रकल्पांमध्ये हजेरी लावली. आज सकाळपर्यंत येडगाव धरणात सर्वाधिक ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाचा धरणातील साठा वाढण्यासाठी मदत होणार आहे. पावसात सातत्य राहिल्यास रब्बी हंगाम समाधानकारक जाऊ शकेल.दोनच दिवस झालेल्या पावसामुळे दुष्काळाचे चित्र काहीसे पुसले जाऊ लागले आहे. सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत वरसगावमध्ये ४५, टेमघरमध्ये २, पानशेत प्रकल्पात २४ व खडकवासला धरणात १३ मिलिमीटर पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सिंचन भवनमधून सांगण्यात आले.भीमा उपखोऱ्यातील धरणांमध्ये २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : पिंपळगाव जोगे २२, माणिक डोह ७, येडगाव ५२, वडज १३, डिंभे २६, घोड २०, विसापूर १७, कळमोडी २७, चासकमान ३५, भामा ३५, वडीवळे ५०, आंद्रा ३२, कासारसाई २७, मुळशी ९, गुंजवणी २२, भाटघर १६, नीरा देवघर २, वीर ४२, नाझरे ३४, उजनी ७.