शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर राडा!

By admin | Updated: August 8, 2015 00:49 IST

जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या अत्यंत चुरशीच्या झाल्या. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विजयाचा उन्माद व पराभवाचे

जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या अत्यंत चुरशीच्या झाल्या. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विजयाचा उन्माद व पराभवाचे शल्य यामुळे काही ठिकाणी राडा झाला. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजविल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दंगलीत झाले. याप्रकरणी २२ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील ७ जणांना अटक करून आज घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे दोन गटांत भांडणे झाली. त्यानंतर या ठिकाणी आलेले पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्यावर बेछूट दगडफेक करून त्यांना जखमी करण्याचा प्रकार घडला. पोलिसांचे वाहन व एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रकार घडला. तर, शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे फटाके वाजविण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. ४५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, १२ जणांना अटक केली आहे.मंचरला घरात घुसून मारहाणमंचर : ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजविल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दंगलीत झाले. त्यामुळे भेकेमळा (मंचर) येथे रात्री धुमश्चक्री उडून सूर्यकांत थोरात यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. तसेच इतर दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी २२ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील ७ जणांना अटक करून आज घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.सूर्यकांत गिरिधर थोरात यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली आहे़ त्यात त्यांनी म्हटले आहे, की गुरुवारी रात्री ८ वाजता आकाश प्रकाश भेके व इतर लोकांनी गावातील बाळणपुरीबाबा मंदिराच्या बाजूला व पराभूत झालेल्या उमेदवार यांच्या घरासमोर फटाके वाजविण्याच्या कारणावरून आमच्यात आणि प्रकाश भेके व इतर लोकांमध्ये शाब्दिक वाद झाला. संभाजी निघोट व बाजीराव मोरडे यांनी प्रकाश भेके यास तुम्ही पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजवू नका असे सांगितले होते. त्या वेळी आकाश भेके व इतर साथीदारांनी शिवीगाळ करून बघून घेतो, अशी धमकी देऊन ते निघून गेले होते.त्यानंतर सूर्यकांत थोरात हे कुटुंबीयांसह झोपलेले असताना रात्री साडेबारा वाजता भेकेमळा येथील अविनाश भेके याने दरवाजा उघड असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. अविनाश भेके, उत्तम भेके, राजू भेके, प्रकाश भेके यांनी घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केली. भाऊ शशिकांतला प्रकाश भेके याने काठीने मारहाण केली. या वेळी त्यांचे सहकारी विविध दुचाकी वाहनांवरून तेथे आले. त्यांनी दगड, लाकडाचे ओंडके, विटांचे तुकडे सूर्यकांत थोरात यांच्या घरावर फेकून मारले. घराची कौले फोडली, लाईटचा मीटर तोडला़ तसेच दुचाकी फोडली़ त्यांच्या शेजारी राहणारे पांडुरंग दत्तात्रय थोरात यांच्या घरावर दगड मारून लाईट मीटर, दुचाकीचे नुकसान केले आहे. जयसिंंग बजरंग भेके यांच्या घरावर दगडफेक करून त्यांना दुखापत केली. तसेच चारचाकी गाडीचे नुकसान केले. (वार्ताहर)दगडफेकीत पोलीस जखमीइंदापूर : निमगाव केतकीत दोन गटांत भांडणे झाली. त्यानंतर या ठिकाणी आलेल्या पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्यावर बेछूट दगडफेक करून त्यांना जखमी करण्याचा प्रकार घडला. पोलिसांचे वाहन व एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रकार गुरुवारी (दि. ६) रात्री घडला. त्यात ९ जण जखमी झाले आहेत. त्यांमध्ये एका हवालदारासह ३ होमगार्ड व २ महिलांचा समावेश आहे.इंदापूर पोलीस ठाण्यात ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. एकूण ३० ते ३२ जणांना गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव यांच्या केतकेश्वर ग्रामविकास पॅनलची सरशी झाली. विजयाच्या उन्मादात अतुल ऊर्फ बाबू राऊत, त्याचे सहकारी अमोल राऊत, शंकर ननवरे, उमेश राऊत, अशोक राऊत यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास निमगाव केतकी गावाच्या हद्दीतील पराभूत गटाच्या चंद्रकांत राऊत यांच्या घराजवळ दुचाकी नेऊन गोंगाट केला. यावरून झालेल्या वादावादीतून अतुल राऊत व १० ते १२ जणांनी चंद्रकांत राऊत व त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांना समजली. ते सहकाऱ्यांसह सायंकाळी तेथे गेले. या वेळी ‘केतकेश्वर ग्रामविकास पॅनल’ची मिरवणूक सुरू होती. त्यामुळे ती थांबवून पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पॅनलप्रमुख देवराज जाधव व त्यांचे कार्यकर्त्यांना ‘मिरवणूक काढू नका’ अशी तंबी दिली. मात्र, त्यांनी मिरवणूक काढणारचं, असे म्हणत पोलिसांवर दगडफेक केली. त्यात हवालदार सुभाष दळवी व तिन्ही होमगार्ड जखमी झाले. पोलिसांच्या वाहनाच्या व लातूर-बारामती एसटी बसच्या काचा दगडफेक करून फोडल्या. दरम्यान, सहकाऱ्यांसह आपण सायंकाळी कान्होबामळा येथील मारुती मंदिरात नारळ फोडत असताना निवडणुकीतील पराभवाचा राग धरून, ‘तू आमच्या रस्त्याने जायचे नाही,’ असे म्हणत उत्तम राऊत याने आपल्या डोक्यात विळा मारून जखमी केले़ तसेच, सुनील राऊत, पराग राऊत, चंद्रकांत राऊत यांनी शिवीगाळ करून, मारहाण केली, अशी तक्रार राऊत यांनी केली आहे. (वार्ताहर)