शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तेलाचा १० टक्के कमी वापर आरोग्यासाठी फायदेशीरच? मोदींच्या आवाहनावर पुणेकरांमधून संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:12 IST

-; दरमहा कुटुंबामागे ७०० ग्रॅमची बचत ! - पंतप्रधान मोदींचे 'आत्मनिर्भर' भारतासाठी आवाहन; पुणेकरांमधून उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया ; देशात ६५ ते ७० टक्के खाद्यतेलाची आयात

पुणे : आखाती युद्धानंतर सागरी वाहतूक विस्कळीत झाली असून जहाजांवर हल्ला होण्याच्या भीतीने वाहतुकीचा विमा खर्च भरमसाठ वाढला आहे. खनिज तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाली आहे. शिवाय पामतेल उत्पादक देशांच्या बायो-डिझेल धोरणामुळे जागतिक पातळीवर खाद्यतेलाची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलो दहा ते पंधरा रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसह तेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. यावरून पुणेकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खाद्यतेलाच्या वापरात १० टक्के बचत केल्यास प्रतिकुटुंब दरमहा ५०० ते ७०० ग्रॅम खाद्यतेलाची बचत करू शकते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असून खर्चातील बचतीला हातभार लावणारे असल्याचा सूर उमटत आहे.

खाद्यतेल वापरात १० टक्के कपात केल्यास देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि परकीय चलनाची बचत करण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकणार असल्याचे काही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान खाद्य तेलाबाबत भारत अद्यापही आत्मनिर्भय नाही. देशात ६५ ते ७० टक्के तेलाची आयात केली जाते. आत्मनिर्भय होण्यासाठी देशातील तेलाचा वापर कमी करावा. जेणेकरून आयात कमी होऊन डॉलरमध्ये खरेदी करणाऱ्या वस्तूची किंमत कमी होऊ शकतील. पूर्वी ४० डॉलर विमा घेतला जात होता, तो ५५ डॉलर प्रति टन घेतला जात आहे. यामुळे परकिय चलन कमी होण्यासाठी डॉलरचा वापर कमी व्हावा यासाठी सरकारने खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे.

- खाद्यतेलाच्या उपलब्धतेत घट

पामतेल उत्पादक इंडोनेशियाने जुलैपासून पेट्रोलमध्ये ५० टक्के पामतेल मिश्रणाचा निर्णय घेतला आहे. मलेशियाने मिश्रण पातळी १० टक्क्यांवरून २५ टक्के केली आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त खाद्यतेल असलेल्या पामतेलाची उपलब्धता घटणार आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुढाकार घ्यावा, विविध प्रकारच्या खाद्यतेल पेंडीच्या निर्यातीवर पाच टक्के अनुदान द्यावे. देशी खाद्यतेल उद्योगाला खेळते भांडवल उपलब्ध करून द्यावे. रिफाइंड तेल आणि संबंधित उत्पादनांची मुक्त आयात बंद करावी तरच तेलाच्या बाबतीत देश आत्मनिर्भय होवू शकतो असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तेल कपातीमधून ५०० ते ७०० ग्रॅम बचत

शहरात व उपनगरात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मार्केटयार्ड बाजारात किराणा माल खरेदी करताना एका कुटुंबाला ४ ते ५ लिटर (किलो) तेलाचा वापर करतात. त्याठिकाणी १० टक्के कपात केली तर त्यामागे ५०० ते ७०० ग्रॅम तेल कमी होवू शकते. यातून तेलाची मोठी बचत होवू शकते. याचा आरोग्यासाठी व आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे. यातून ५०० ते १ हजार रूपयांची बचत होवू शकते.
-----

- खाद्यतेलाचे सध्याचे दर (प्रति किलो व लिटर)

तेलाचा प्रकार किरकोळ दर घाऊक प्रति किलो दर (१५ किलो/लिटर डबा)

सोयाबीन तेल १६० ते १६५                         २४०० ते २४७५
सूर्यफूल तेल १७५ ते १८०                         २४५० ते २५००

शेंगदाणा तेल १८० - २१०                         २८५० ते २९००
सरकी तेल १५० ते १५५                         २५०० त २५२०पाम तेल             १४५ ते १५०                         २४०० ते २४५०
---
 
तेलाचा अतिवापर देतेय हृदयविकाराला निमंत्रण

बदलती जीवनशैली, तळकट पदार्थांचे वाढते सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत दररोजच्या आहारात तेलाचे प्रमाण किती असावे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तेल पूर्णपणे बंद करण्याऐवजी योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने सेवन करणे अधिक महत्त्वाचे आहे.आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रती व्यक्ती दररोज साधारण ५ ते १० ग्रॅम तेल पुरेसे मानले जाते. यात स्वयंपाकात वापरलेले तेल, तळलेले पदार्थ, फरसाण, बेकरी पदार्थ आणि बाहेरील खाद्यपदार्थांमधील तेलाचाही समावेश होतो.

डॉलर वाचवण्यासाठी आणि परकीय चलनाचा वापर कमी व्हावा यासाठी देशवासीयांनी तेलाचा वापर कमी करावा असे आवाहन केले आहे. देशात खाद्यतेलाचा साठा मुबलक आहे. भविष्यात तेलाची टंचाई होवू नये यासाठी खाद्य तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा. हे आरोग्यासाठी आणि आर्थिकदृष्टया फायदेशिर आहे. याला पुणेकरांनी साथ देण्याची गरज आहे. - रायकुमार नहार, तेलाचे व्यापारी व माजी अध्यक्ष दी पूना मर्चट चेबर, पुणे. 
 

जानेवारी महिन्यात तेलाचे भाव डब्यामागे २०० रुपये वाढले होते. मात्र मार्चमध्ये पुन्हा कमी होऊन ते भाव आता पुन्हा वाढले आहेत. १५ किलोच्या डबा सध्या २४०० ते २५०० असून आता दर स्थिर आहेत. मात्र भविष्यात कच्च्या तेलावर भारत सरकारने कर वाढवला तर तेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्राहकाने तेलाचा योग्य वापर करावा.  - सतवीर गोयल, मार्केटयार्ड   

आहारात अधिक फॅट असलेले तेल, तूप, लोणी यांचे प्रमाण कमी ठेवावे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडईतेल, तिळाचे तेल यांचा आलटून-पालटून वापर केल्यास शरीराला विविध प्रकारचे फॅटी अॅसिड मिळतात. हृदयाच्या आरोग्यासाठी तेलात तळलेले पदार्थ टाळणे हिताचे आहे - डॉ. राहूल सावंत, हृदयरोग तज्ज्ञ.
 
घरातील चार व्यक्तींसाठी महिन्याला साधारण ६०० ते ७५० ग्रॅम तेल पुरेसे ठरते. कुटुंबाच्या एकूण सदस्यसंख्येनुसार तेलाचा वापर ठरवल्यास नियंत्रण ठेवणे सोपे जाते. तेलाचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी वाफवलेले, उकडलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. बाहेरील फास्टफूड, वारंवार तळलेले स्नॅक्स आणि रेडीमेड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग्य प्रमाणात तेल, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. - डॉ. अविनाश भोंडवे, आरोग्य तज्ज्ञ.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Reacts: Is 10% Less Oil Good for Health?

Web Summary : Amidst rising edible oil prices, PM Modi's call for reduced oil consumption receives mixed reactions in Pune. Experts suggest it can boost health, save money and strengthen the economy, but self-reliance in oil production is vital.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी