शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बेलसर टोलवरून संताप उसळला; अपूर्ण कामांवर वसुलीला नागरिकांचा तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:18 IST

- “पुरंदरकरांना टोलमाफी द्या”ची एकमुखी मागणी; बैठकीत प्रशासन-नागरिकांमध्ये खडाजंगी

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावरून पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली असून, अपूर्ण कामांवर टोलवसुली सुरू केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संपूर्ण पुरंदर तालुक्याला टोलमधून वगळावे, अशी ठाम मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी राम लठाड यांच्या उपस्थितीत नागरिकांनी प्रलंबित कामांचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले. रस्ता केवळ ७० टक्के पूर्ण असताना टोल वसुली सुरू करण्यात आल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी ती तात्काळ थांबवण्याची मागणी केली.

शासनाच्या नियमांनुसार किमान ७५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच टोल आकारणी करता येते, असा मुद्दा आंदोलकांनी ठामपणे मांडला. तसेच रस्त्यावरील अनेक त्रुटींचाही पाढा वाचण्यात आला. दुभाजकांवर अद्याप प्रकाशयोजना नसल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक होत असल्याचे सांगण्यात आले. वाल्हे परिसरात अपेक्षित ४५ मीटरऐवजी केवळ ३० मीटर रुंदीचा रस्ता करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

नीरा परिसरातील नागरिकांना महामार्गावर येण्यासाठी असुविधाजनक वळणे देण्यात आली असून, अनेक ठिकाणी अपघातप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. तक्रारवाडी फाट्याजवळील टोलप्लाझाही सदोष असल्याचे नागरिकांनी नमूद केले. जेजुरीच्या यात्रा व सुटीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दिवेघाटासह अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू असल्याने नाराजी वाढली आहे.

पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होऊन ठोस तोडगा निघेपर्यंत पुरंदर तालुक्यातील नागरिकांकडून टोल वसुली थांबवावी.” स्थानिकांना आधार कार्डच्या आधारे सवलत देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेला उपस्थितांचा जोरदार पाठिंबा मिळाला.

नागरिकांनी टोल कंपनीच्या कामकाजावरही गंभीर आरोप केले. टोल कर्मचाऱ्यांकडून वाहन चालकांशी उद्धट वर्तन, विनाकारण अडवणे आणि दबाव टाकण्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सभापती अतुल म्हस्के, शिवसेनेचे दादा थोपटे, धीरज जगताप, मनसेचे तालुकाध्यक्ष उमेश जगताप, जेजुरी शहराध्यक्ष गणेश कुंभार, दादा फाउंडेशनचे यशवंत दोडके, शिवराज झगडे, नितीन राऊत, राष्ट्रवादीचे रमेश लेंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडली. वाल्हे, खळद, साकुर्डे, जेजुरी, नीरा, पिंगोरी, बेलसर, निळुंज, वाळुंज, नावळी, दौडज, गुळुंचे येथील नागरिक व आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत एकमुखाने ठराव मांडत अपूर्ण कामांवर टोल आकारणी तत्काळ बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत पुरंदरवासीयांनी टोल देऊ नये आणि आधार कार्ड दाखवून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. एकूणच, बेलसर टोल नाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, प्रशासन आणि नागरिकांमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील बैठकीत यावर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाMaharashtraमहाराष्ट्रPurandarपुरंदर