शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

पुणे जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा; २७ गावं, १२९ वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 5:48 PM

निसर्ग चक्री वादळ तसेच चांगल्या पावसामुळे मागील वर्षी सर्व धरणे भरली. जलसंधारण विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाणी टंचाई जाणवली नाही....

पुणे : जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणे भरल्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या अवर्तनामुळे पाणलोट क्षेत्रात टंचाईसुरु झाली आहे. जिल्ह्यातील २७ गावे  आणि १२९ वाड्या वस्त्यांवर 46 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ३७ हजार १७२ हजार नगरिकांना याचा लाभ मिळत आहे. 

निसर्ग चक्री वादळ तसेच चांगल्या पावसामुळे मागील वर्षी सर्व धरणे भरली. जलसंधारण विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र एप्रिल मे महिन्यात उन्हाची दाहकता अनुभवायला येत आहे. दुर्गम तसेच अवर्षणप्रवण परिसरात जलस्रोत आटले आहेत. यामुळे त्या ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. धरणांतून सुरु असलेल्या अवर्तनामुळे पाण्याची पातली घटली आहे. परिणामी जिल्ह्यातील २७ गावात आणि १२९ वाड्या वस्त्यांवर ४६ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. 

गेल्या वर्षीच्या विचार केल्यास सध्या जिल्ह्यात सुरू असलेली टँकरची संख्या ही तुलनेने कमी आहे. जिल्ह्यातील पाणी प्रश मिटवण्यासाठी जळजीवन मिसजन अंतर्गत सर्वाधिक रकमेचा टंचाई आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्या अंतर्गत जिल्ह्यात पाणीटंचाई कमी करण्यासाठी तलाव खोदणे, विंधन विहिरी खोदणे गाळ उपसने, नळ पाणी पुरवठा योजना राबविणे अशी कामे हाती घेण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहेत.     ......... सर्वाधिक टँकर आंबेगाव तालुक्यातयंदा चांगल्या पावसामुळे पाण्याची स्थिती चांगली आहे. आंबेगाव, भोर, हवेली, खेड, जुन्नर या चार तालुक्यातील काही गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक ११ टँकरने पाणी पुरवठा होत आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊस