शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी बनली आहे अधिकारी-राजकारण्यांचे कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2015 00:18 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपी) आर्थिक शिस्त राहिली नाही. पैसे कशासाठी वापरायचे हेच कळत नाही. मागील आठ वर्षांत पीएमपीला संचलन, वित्त व मानव संसाधन

- जुगल राठी

पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपी) आर्थिक शिस्त राहिली नाही. पैसे कशासाठी वापरायचे हेच कळत नाही. मागील आठ वर्षांत पीएमपीला संचलन, वित्त व मानव संसाधन या विभागांसाठी स्वतंत्र तज्ज्ञ संचालक नेमता आले नाहीत. ते नसल्यामुळे पीएमपी अधिकारी व राजकारण्यांचे कुरण बनली आहे. चांगले अधिकारी योग्य ठिकाणी नसल्याने पीएमपीवर ही स्थिती ओढविली आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मागील आठ वर्षांत तीन तज्ज्ञ संचालकांची नेमणूक न केल्याने नियोजनशून्य कारभार सुरू आहे. कंपनी स्थापन करताना तीन तज्ज्ञ संचालक नेमावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पण लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनाच हे तज्ज्ञ नको असल्याचे सध्याचे चित्र आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ६० लाख लोकांची जीवनरेखा म्हणून पीएमपीकडे पाहिले जाते. दर्जेदार व भरवशाची सेवा रास्त दरात मिळावी, यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आली होती. मात्र हा हेतू सफल झालेला नाही. अधिकारी व राजकारण्यांनी स्वत:चा हेतू साध्य करण्यासाठीच पीएमपीचा वापर केला. पीएमपीला पूर्णवेळ आयएएस अधिकारी मिळत नाही. तज्ज्ञ संचालकांची नेमणूक केली जात नाही. याकडे जाणीवपूर्वक काणाडोळा केला जातो. या संचालकांची नेमणूक केली असती तर निश्चित फरक पडला असता. तज्ज्ञ संचालक नसल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांचे फावले असून आर्थिक व्यवहार सुरू असतात. हे विभाग कंपनीचा गाभा आहेत. तो गाभाच पोखरला जात आहे. त्यामध्ये सर्वच यंत्रणा सामील आहे. प्रशासन नियंत्रणाबाहेर जाऊ लागले आहे. सुशासन राहिलेले नाही. यामागे मोठी लॉबी असण्याची शक्यता आहे. नवीन सरकारकडून थोड्याफार अपेक्षा आहेत. पण सध्या येथील लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. सर्वच जण उलट्या दिशेने सक्रिय आहेत. सध्याच्या संचालक मंडळातही राजकारणी संचालकांचे काय काम आहे? लोकाभिमुख व प्रवासी केंद्रित प्रशासन यंत्रणा तयार करायची असल्याने तज्ज्ञ संचालकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पीएमपीची स्थिती सुधारण्यास सुरुवात होणार नाही. राजकारण्यांचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा हीच अपेक्षा आहे.