शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हर घर झेंडा उपक्रमात महात्मा गांधी, नेहरू यांचे फोटो कुठेच दिसत नाहीत; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 12:40 IST

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात झेंड्याचा सन्मान झालाच पाहिजे. पण सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू असे अनेक जण आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्व बलिदान दिले पण त्यांचे फोटो कुठेच दिसत नसल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पटोले म्हणाले, मोदी यांनी हर घर झेंडा हा उपक्रम राबवला आहे. झेंड्याचा सन्मान झालाच पाहिजे पण सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू असे अनेक जण आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्व बलिदान दिले पण त्यांचे फोटो कुठेच दिसत नाही. नाईक यांचा विचार जर यातून त्यांनी पोहचवला असता तर अजून आनंद झाला असता. फाळणी बद्दल चित्रिफिती दाखवण्याचा निर्णय जो सरकार ने घेतला आहे. या विषयी हिंदू सभा आणि मुस्लीम लीग चे मोठे योगदान आहे. मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा यांनी देशाला आग लावली. त्यावेळी हे दोघे ही एकत्र होते या दोघांमध्ये फाळणी झाली हे लोकांच्या समोर आले पाहिजे.  

अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे

चीन मधून असे झेंडे तयार हून येत असतील. तर मोदी, अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण तिरंग्याचा अपमान होऊ नये. आमची ओळख या ध्वजापासून सुरू होते. हा अपमान सरत्याने केला जातो आहे. हे काम जर भारतीय कामगारांना दिला असता तर त्यांना रोजगार मिळाला असता. आता त्यांना देशाला लुटायचे आहे जसे महाराष्ट्राचे सरकार लोकांना लुटून गुजरात ला फायदा करून देते आहे. पहिल्या कॅबिनेट मध्ये त्यांनी बुलेट ट्रेन ला मंजूर दिली पण शेतकऱ्यांना एक ही मदत नाही असेही पटोले यावेळी म्हणाले आहेत 

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिरंग्याचा मुद्दा आम्ही सरकारला प्रश्न विचारणार  मुख्यमंत्री २० तास कोणासाठी काम करत आहेत हे बघायला पाहिजे. आम्ही रात्री १ वाजेपर्यंत काम करतो. काही लोकांना झोप लागत नसेल. आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आहे. अतिवृष्टी जिथे झाली तिथे मदत नाही मिळाली. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिरंग्याचा मुद्दा याबद्दल आम्ही सरकारला प्रश्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाIndependence Dayस्वातंत्र्य दिन