शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांमध्ये गुणात्मक बदल आवश्यक

By admin | Updated: January 11, 2015 00:50 IST

देशातील सर्वच पक्षांमध्ये चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. राजकीय पक्षांमधील मतभिन्नता राजकारणाची समस्या नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे.

पुणे : देशातील सर्वच पक्षांमध्ये चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. राजकीय पक्षांमधील मतभिन्नता राजकारणाची समस्या नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे. त्यासाठी सर्व पक्षांसह राजकारणात गुणात्मक बदल आवश्यक आहे. राजकारणात येणाऱ्या तरुणांनी सर्व भेद बाजूला ठेवून व्यापक दृष्टिकोनातून विकासाचे राजकारण केल्यास हे परिवर्तन निश्चित होईल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित पाचव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार रेणुका चौधरी, खासदार किरण खेर, माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, केंद्रीय युवक कल्याण विभागाचे सचिव राजीव गुप्ता, ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, प्रियदर्शनी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष नानिक रुपाणी, माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, छात्र संसदेचे संस्थापक निमंत्रक राहुल कराड, डॉ. मंगशे कराड विद्यार्थी प्रतिनिधी सानिध्य बाली व ख्याती राजा व्यासपीठावर उपस्थित होते. चौधरी व खेर यांना या प्रसंगी अनुक्रमे गार्गी पुरस्कार व मैत्रेयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गडकरी म्हणाले, की आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता नसते; पण देशाची ध्येयधोरणे ठरविण्यात त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. राजकारण्यांची वागणूक, गैरव्यवहार यांमुळे समाजाचा विश्वास कमी झाला आहे. यात समाजाचा दोष नाही. देशात अनेक समस्या आहेत. त्यांना संधी मानून तरुणांनी देशाच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.भारतात आता पाण्याचा मोठा व्यापार झाला आहे. चांगले राजकारण करायचे असेल, तर पर्यावरणाला महत्त्व द्यायला हवे, असे डॉ. राजेंद्र सिंग यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)४छात्र संसदमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले, ‘‘राजकारणात येण्यासाठी अनेक जण घराकडे दुर्लक्ष करतात. व्यवसायात अपयश आले म्हणून राजकारणात येतात. मात्र, जे लोक स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत, त्यांना देश कसा सांभाळता येईल? त्यामुळे तरुणांनी आधी स्वत:ला ओळखावे. आपली जबाबदारी ओळखून राजकारणात प्रवेश करावा.’’४महिला केवळ मनोरंजनाची किंवा घरात राबण्याची वस्तू नाही. तीदेखील क्षमताधिष्ठित, स्पर्धात्मक आणि गुणवत्ताधारक आहे. त्यामुळे महिलांना वगळून देशाचा विकास होऊ शकत नाही, असे चौधरी म्हणाल्या.