शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बियाण्यात लाखोंची फसवणूक

By admin | Updated: March 23, 2015 23:07 IST

कांदा बियाण्यात शेतकऱ्यांची लोखो रुपयांची फसवणूक झाली आहे. चार हजार किलो या भावाने घेतलेले कांदा बी शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले

मंचर : कांदा बियाण्यात शेतकऱ्यांची लोखो रुपयांची फसवणूक झाली आहे. चार हजार किलो या भावाने घेतलेले कांदा बी शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले असून, अनेक शेतात कांद्याऐव(वार्ताहर)णुकीची तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मागील दोन वर्षांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. पारंपरिक पद्धतीचे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. अनेक शेतकरी कांदा बी घरच्या घरी तयार करतात; मात्र हे प्रमाण कमी आहे. त्याऐवजी बी विकत घेऊन त्याची रोपे प्राधान्याने तयार केली जातात. या रोपांची लागवड शेतात करून कांदा उत्पादन घेतले जाते.कांदा बीच्या दरात वाढच होत गेली आहे. दोन वर्षांपूर्वी ५०० रुपये किलो या भावाने बी उपलब्ध होते. मागील वर्षापासूनतुटवडा भासू लागला. मात्र त्यानंतर कांदा बियाण्याच्या दरात भरमसाट वाढ झाली. सुरुवातीस पंचवीचशे रुपये तर शेवटच्या टप्प्यात तब्बल चार हजार रुपये किलो कांदा दर झाला. शेतकऱ्यांना कांदा बी मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. जळगाव, जालना, औरंगाबाद, नाशिक येथे जाऊन शेतकऱ्यांनी कांदा बी आणले. स्थानिक व चाकण बाजारातही कांदा बी मिळाले.शेतकऱ्यांनी रोपे तयार करून लागवड केली. पिकांची काळजी घेतली. महागडी खताची मात्र दिली. कांदापीक दोन महिन्यांचे झाले तेव्हा फसवणूक झाल्याचे दिसून आले. दुभाळके (ढेंगळे) मोठ्या प्रमाणावर दिसून आले व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुभाळके कांदा वजनाला हलका तसे बदला म्हणून त्याची गणना होते. तो शेतात जास्त दिवस ठेवल्यास वजनाला हलका होऊन खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची अशी फसवणूक झाली आहे. जिल्हा व इतर भागातील बियाण्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार पाहिले तर लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे. (वार्ताहर)४शेतकरी कांदा बी खरेदी करताना खरेदी पावती बनवत नाहीत. त्यामुळे फसवणूक झाली तर तक्रार करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. काहींनी धाडस करून तक्रार केली; मात्र हे बी मी दिलेच नाही असा पवित्रा बी विक्रीकरणारांनी घेतला. काहींनी तर दलालीचा अवलंब केला. दूरवरून मोठ्या प्रमाणावर बी आणून त्यांनी ते शेतकऱ्यांना विकले. मध्ये मोठा नफा कमविला. आता त्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.४खरीप हंगामाची बियाणे रब्बीला वापरा, हा प्रकार झाला. जुने बियाणाची उगवणच झाली नाही. यात फसवणुकीचा आकडा मोठा असेल. अवेळी पाऊस, थंड वातावरण, नत्रयुक्त खताचा जास्त वापर, जास्त दिवसांचे रोप ही कांदापिकाला फटका बसण्याची काही कारणे असून, त्यामुळेही डेंगळे आले आहेत.चार एकर कांदा लागवड केली. त्यात तीस टक्के डेंगळे निघाली आहेत. त्याचा फटका उत्पादक व उत्पन्नास बसणार आहे. शेतकऱ्यांनी यापुढे बी घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे. जिल्ह्याच्या बाहेरून आलेले बियाणे प्रामुख्याने फसवे असून, त्या बियाण्यालाच डेंगळे आली आहेत.- गोविंद जाधवकांदा उत्पादक शेतकरी, ओझर