शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेलेत ; उदयसिंह पेशवा यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 18:48 IST

बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. 

पुणे: बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या २८८ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार वाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. तसेच ऐतिहासिक शनिवार वाड्याचा इतिहास मनात आठवत असतानाच  शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा पुणेकर आणि पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, उदय वाडदेकर, अनिल नेने, प्रकाश दाते, मकरंद माणकीकर, उमेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.

पेशवा म्हणाले, ऐतिहासिक वास्तूत  सुधारणा झाली तर जास्तीत जास्त पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतील. या वास्तुकडे लक्ष देणे सरकारचे काम आहे. शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्राचे भूषण आहे.वाड्याचे वरच्या भागातील लाकूड काम पडण्याच्या अवस्थेत आहे. तसेच या दिल्ली दरवाज्याची अवस्था फारच बिकट आहे. सरकारने शनिवारवाड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने अशी अवस्था झाली आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही पेशव्यांची आहे हे लक्षात ठेवावे. आम्ही शनिवारवाड्याच्या सुधारणेबाबत कोणालाही भेटणार नाही. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन याबाबत विचार करावा.

मोहन शेटे म्हणाले, या जागेवर १० जानेवारी १७३० रोजी भूमीपूजन झाले होते आणि त्यानंतर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवार वाड्याची वास्तूशांत झाली. अनेक वर्षांनी हा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला आहे आणि अनेक आठवणी मनात येत आहेत. शनिवार वाड्यासारख्या भव्य वास्तू महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक असतील परंतु या वास्तुसमोर जो पराक्रम घडला आहे, त्या पराक्रमाची तुलना करता येणार नाही. सतत ८० वर्ष भारतावर प्रभुत्व निर्माण करण्याचे काम या वाड्याने केले होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. आज पानिपतच्या रणसंग्रामाची देखील आठवण होत आहे. पानिपतच्या युध्दात मराठे लढले, आपल्या मातीची लाज राखण्यासाठी.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी. अशा पराक्रमाचा इतिहास या वाड्याला लाभलेला आहे.

टॅग्स :shanivar wadaशनिवारवाडाhistoryइतिहासGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रPeshwaiपेशवाई