शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:17 IST

१ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करा, शांततेत आंदोलन करा

वरवंड : मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला असून पुरावे असताना जाणूनबुजून लपवण्यात येत होते, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांची वरवंड येथील बाजार मैदानात विराट सभा झाली. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, गोरगरीब मराठ्यांचे मुडदे पाडून सत्तर वर्षे सरकारने पाळलेले बागलबच्चे समिती नेमतात, आयोग बनवले; पण मराठ्यांची नोंद सापडली नाही. ओबीसीमध्ये असतानाही आमच्या मराठ्यांचे पुरावे शोधले नाही. आता समितीने पुरावे शोधण्यास सुरुवात केली. १८०५ पासून न्यायमूर्तींनी २०२३ पर्यंतचे पुरावे आजरोजी सापडले आहेत. या सरकारने ७० वर्षे पुरावे लपून ठेवले होते, आज कसे सापडले? मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण असताना घात केला. यांनी ठरवून षडयंत्र केले आहे. मराठ्यांच्या विराट शक्तीपुढे सरकार जागे झाले. या एकीपुढे सरकारने नमते घ्यावे लागले. मराठ्यांचा २४ डिसेंबरला विजय होणार आहे. आता मागे नाही हटणार. आपण ७० टक्के लढा जिंकला आहे. जर या राजकीय मंडळींनी चाळीस वर्षे साथ दिली असती तर आज आरक्षण मिळाले असते. जे राजकीय लोक आपले नाहीत, आपण त्यांना मोठे केले आहे. या नेत्यांचा आपल्याला काहीतरी उपयोग होईल, या आशेने आपण त्यांना निवडून दिले. आजचे नेते आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलू लागले आहेत. जे आपल्या मदतीला येणार त्यांना आपण मदत करणार आहोत. विजयाचा दिवस जवळ आलेला आहे. मतभेद होऊन देऊ नका, आपल्या लेकरांचे वाटोळे होऊन देऊ नका. राजकारणांना जवळ करू नका. १ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करा. शांततेत आंदोलन करा.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलagitationआंदोलनdaund-acदौंड