शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Bandha: पुण्यात सिंहगड रस्त्यावरून महाविकास आघाडीने काढला पायी मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:09 IST

शिवसेना (shivsena), काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) यांनी एकत्र येत सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून बंदचे आवाहन केले.

ठळक मुद्देधायरी येथील भैरवनाथ मंदिर ते वीर बाजी पासलकर पुलापर्यंत काढण्यात आला

धायरी : लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.  शिवसेनाकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून बंदचे आवाहन केले. दरम्यान, परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र महाविकास आघाडीच्या वतीने शंभर टक्के बंद यशस्वी झाला असल्याचे सांगण्यात आले. 

उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना वाहनांनी चिरडून मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व चिड आणणारा आहे. याच निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी पायी मोर्चाचे आयोजन केले. हा मोर्चा धायरी येथील भैरवनाथ मंदिर ते वीर बाजी पासलकर पुलापर्यंत काढण्यात आला. 

आज केंद्र सरकारच्या विरोधात समाजातील प्रत्येक घटक उभा राहिला :-  रुपाली चाकणकर 

''शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारच्या वतीने दडपशाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. ब्रिटिश राजवटीपेक्षा भयाण स्थिती आज देशात झाली आहे. आज केंद्र सरकारच्या विरोधात समाजातील प्रत्येक घटक उभा राहिला आहे असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी सांगितले.''

काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीरंग चव्हाण, राष्ट्रवादी खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण,संतोष चाकणकर, स्वाती पोकळे, सुनीता डांगे, प्रभावती भूमकर, राजेश्वरी पाटील, शरद दबडे,भूपेंद्र मोरे, काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल मते, शिवसेना खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन वाघ आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :DhayariधायरीPuneपुणेMaharashtra BandhMaharashtra BandhShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस