शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

महाराष्ट्र चांगलाच तापला! मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट! जळगावात जमावबंदी लागू

By श्रीकिशन काळे | Updated: May 26, 2024 18:12 IST

धुळे, जळगाव, अकोला, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड पुढील ४८ तासांत उष्णतेची लाट येणार असून, सायंकाळी पावसाची शक्यता

पुणे : महाराष्ट्र चांगलाच तापू लागला असून, अकोला, जळगाव ही शहरे तापदायक ठरत आहेत. येथे ४५ अंशावर कमाल तापमान नोंदले जात आहे. म्हणूनच जळगावात तर १४४ कलम लागू करावे लागले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

नैऋत्य मॉन्सूनची वाटचाल बंगालच्या उपसागाराच्या नैऋत्य, मध्य व ईशान्य भागात झाली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस, तर मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात व विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट् चांगलाच तापत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हे उष्ण झळांनी भाजून निघत आहेत. तर राज्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोल्यात झाली. पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. देशामध्ये राजस्थानातील बारमेरमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४८.८ अंश तापमान नोंदले गेले. 

पाकिस्तान व अफगाणिस्तानमार्गे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे वायव्य आणि मध्य भारतात उष्मा वाढत आहे. या उष्ण झळांनी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उकाड्याने चांगलाच घाम निघत आहे. राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर कोकणातील पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच कोल्हापूर, सातारा आणि इतर भागात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

धुळे, जळगाव, अकोला, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड पुढील ४८ तासांत उष्णतेची लाट येणार असून, सायंकाळी पावसाची शक्यता आहे. यातील अकोला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमान असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

जळगावात १४४ कलम लागू 

अकोल्यात आणि जळगावात कमाल तापमान ४५ अंशाच्या वर नोंदले जात आहे. त्यामुळे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २५ मे पासून ३ जूनपर्यंत १४४ कलम (जमावबंदी) लागू केले आहे. नागरिकांनी दिवसा उन्हात बाहेर फिरू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

देशामध्ये राजस्थान, पंजाब आणि विदर्भातील काही शहरांत उष्णतेची लाट आहे. अकोल्यात तर पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येणार असून, जळगावातही तापमान ४५ अंशावर नोंदले जात आहे. जळगावात कलम १४४ लागू केले. हे पहिल्यांदाच ऐकत आहे. तापमान वाढल्याने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. परंतु, नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून या सूचना दिल्या असाव्यात. - डॉ. अनुपम कश्यपी, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानRainपाऊसenvironmentपर्यावरणHealthआरोग्यVidarbhaविदर्भJalgaonजळगावMarathwadaमराठवाडा