शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

महाराष्ट्र चांगलाच तापला! मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट! जळगावात जमावबंदी लागू

By श्रीकिशन काळे | Updated: May 26, 2024 18:12 IST

धुळे, जळगाव, अकोला, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड पुढील ४८ तासांत उष्णतेची लाट येणार असून, सायंकाळी पावसाची शक्यता

पुणे : महाराष्ट्र चांगलाच तापू लागला असून, अकोला, जळगाव ही शहरे तापदायक ठरत आहेत. येथे ४५ अंशावर कमाल तापमान नोंदले जात आहे. म्हणूनच जळगावात तर १४४ कलम लागू करावे लागले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

नैऋत्य मॉन्सूनची वाटचाल बंगालच्या उपसागाराच्या नैऋत्य, मध्य व ईशान्य भागात झाली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस, तर मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात व विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट् चांगलाच तापत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हे उष्ण झळांनी भाजून निघत आहेत. तर राज्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोल्यात झाली. पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. देशामध्ये राजस्थानातील बारमेरमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४८.८ अंश तापमान नोंदले गेले. 

पाकिस्तान व अफगाणिस्तानमार्गे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे वायव्य आणि मध्य भारतात उष्मा वाढत आहे. या उष्ण झळांनी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उकाड्याने चांगलाच घाम निघत आहे. राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर कोकणातील पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच कोल्हापूर, सातारा आणि इतर भागात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

धुळे, जळगाव, अकोला, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड पुढील ४८ तासांत उष्णतेची लाट येणार असून, सायंकाळी पावसाची शक्यता आहे. यातील अकोला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमान असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

जळगावात १४४ कलम लागू 

अकोल्यात आणि जळगावात कमाल तापमान ४५ अंशाच्या वर नोंदले जात आहे. त्यामुळे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २५ मे पासून ३ जूनपर्यंत १४४ कलम (जमावबंदी) लागू केले आहे. नागरिकांनी दिवसा उन्हात बाहेर फिरू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

देशामध्ये राजस्थान, पंजाब आणि विदर्भातील काही शहरांत उष्णतेची लाट आहे. अकोल्यात तर पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येणार असून, जळगावातही तापमान ४५ अंशावर नोंदले जात आहे. जळगावात कलम १४४ लागू केले. हे पहिल्यांदाच ऐकत आहे. तापमान वाढल्याने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. परंतु, नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून या सूचना दिल्या असाव्यात. - डॉ. अनुपम कश्यपी, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानRainपाऊसenvironmentपर्यावरणHealthआरोग्यVidarbhaविदर्भJalgaonजळगावMarathwadaमराठवाडा