शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुण्याचं मैदान भाजपने मारलं! मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने झुंजवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 19:56 IST

शहरातील आठही मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वर्चस्व राखलेल्या भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच झुंजविले...

पुणे : शहरातील आठही मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वर्चस्व राखलेल्या भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच झुंजविले. हडपसर व वडगाव शेरीतील चुरशीच्या लढतीत विजय खेचून आणत राष्ट्रवादीने भाजपाला आस्मान दाखविले. तर खडकवासल्यातही जोरदार टक्कर देत राष्ट्रवादीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले. पुणे कॅन्टोन्मेंट व शिवाजीनगर मतदारसंघातही दोन्ही काँग्रेसची एकजुट भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरली. मागील विधानसभा निवडणुक दोन्ही काँग्रेस, भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. यामध्ये भाजपाची आठही मतदारसंघात सरशी झाली होती. त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीतही दोन्ही काँग्रेसची मोठी घसरण झाली. त्यामुळे एकेकाळी शहरावर वर्चस्व असलेल्या काँग्रेसची दयनीय स्थिती झाल्याचे चित्र होते. उपनगरांमध्येही राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याने नेते, कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण झाली होती. परिणामी या विधानसभा निवडणुकीत शहरातील बहुतेक जागांवर भाजपा-शिवसेना महायुती सहजपणे पुन्हा विजयी होईल, अशीच अटकळ बांधली जात होती. प्रचारादरम्यानही दोन्ही काँग्रेसमध्ये जोर लावल्याचे दिसून आले नाही. पण प्रत्यक्ष निकाल हाती येऊ लागल्यानंतर भाजपाला एकावर एक धक्के बसु लागले. 

काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा व शिवाजीनगर मतदारसंघापैकी कॅन्टोमेटमध्ये लढत होईल, अशी शक्यता होती. अपेक्षेप्रमाणे रमेश बागवे यांनी भाजपाच्या सुनिल कांबळे यांच्यासमोर आव्हान उभे केले. पहिल्या फेरीपासून कांबळे यांना विजयासाठी झुंजावे लागले. माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, सुधीर जानजोत तसेच कॅन्टोमेंट बोडॉतील काँग्रेसचे चार नगरसेवकही ऐनवेळी भाजपात गेले. तसेच वंचित आघाडीकडून काँग्रेसचे माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे आणि ‘एमआयएम’ने घेतलेली मते बागवे यांचा पराभव करणारी ठरल्याचे दिसते. या प्रतिकुल परिस्थितीतही बागवे यांना मागील निवडणुकीत पडलेली सुमारे ३९ हजार मते यावेळीही कायम राहिली. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी सुमारे ४७ हजार मते मिळविली. मागील निवडणुकीत काँग्रेसला ३१ हजार मते मिळाली होती. तर सध्या काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक असलेले व त्यावेळी मनसेकडून लढलेले रविंद्र धंगेकर यांनी २६ हजार तर राष्ट्रवादीचे दिपक मानकर यांना सुमारे १६ हजार मते मिळाली होती. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने एकत्रितपणे लढत दिल्याचे मतांवरून दिसून येते. ------------शिवाजीनगर मतदारसंघातील लढत एकतर्फी होईल, ही शक्यता काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी फोल ठरविली. या मतदारसंघातही काँग्रेसला काही धक्के बसले. काँग्रेसचे माजी महापौर दत्ता गायकवाड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, खडकी कॅन्टोन्मेंट बोडॉतील चार नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाला साथ दिली. तसेच मागीलवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले अनिल भोसलेही पक्षासोबत नव्हते. त्यामुळे भाजपाचे सिध्दार्थ शिरोळे यांचा विजय सुकर झाल्याचे चित्र होते. पण बहिरट यांनी पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत ही लढत रंगतदार ठरली. मागील निवडणुकीत तब्बल २२ हजारांनी निवडून आलेल्या भाजपाला यावेळी केवळ ५ हजारांचे मताधिक्य मिळाले.हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी भाजपाचे योगेश टिळेकर यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली. मागील निवडणुकीत तुपे यांनी सुमारे ३० हजार तर टिळेकरांना ८२ हजार मते मिळाली होती. त्यावेळी शिवसेनेचे महादेव बाबर यांना ५२ हजार मते होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र तुपे यांना तिप्पट मते मिळाली. दोन्ही काँग्रेसची एकजुट त्यांना विजयाकडे घेऊन गेली. वडगाव शेरी मतदारसंघात सुनिल टिंगरे यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा म्हणावा लागेल. अत्यंत प्रतिकुल स्थिती असताना टिंगरे यांनी ही लढत जिंकली. माजी आमदार बापु पठारे यांनी ऐनवेळी त्यांना धक्का दिला. तसेच नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती व काही पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाचे जगदीश मुळीकांचा विजय निश्चित मानला जात होता. पण टिंगरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकाकी झुंज देत मुळीक यांचे आव्हान मोडून काढले. मागील निवडणुकीत शिवसेनेकडून लढताना त्यांचा केवळ ५ हजार ३०० मतांनी पराभव झाला होता. यंदा जवळपास तेवढ्याच मताधिक्याने ते विजयी झाले. त्यांनी दिलेली लढत चर्चेचा विषय ठरली.पर्वती मतदारसंघात भाजपाच्या माधुरी मिसाळ यांना विजयासाठी फारसे झगडावे लागले नाही. पण राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांनी मागील निवडणुकीच्या तुलनेत मिळविलेली ६० हजारांहून अधिक मते उल्लेखनीय ठरली.खडकवासला मतदारसंघातील लढतही चुरशीची ठरली. राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांनी आमदार भीमराव तापकीर यांना अखेरच्या फेरीपर्यंत वाट पाहायला लावली. वारजे-माळवाडीत मिळालेली भरघोस मते तसेच अन्य भागातूनही त्यांचा मिळालेली पसंती त्यास कारणीभुत ठरली. केवळ २६०० मतांनी त्यांचा पराभव झाला. मागील निवडणुकीत तापकीर तब्बल ६३ हजार मतांनी विजयी झाले होते. राष्ट्रवादीने दिलेली ही लढत भाजपासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Result Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना