शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी अभयारण्यावर कुऱ्हाड

By admin | Updated: January 21, 2015 00:39 IST

येरवडा परिसरातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची जबाबदारी वनविभाग आणि महापालिका दोघांकडूनही झटकली जात असल्याने येथील वृक्षतोडीवर कोणाचा अंकुशच राहिला नाही.

पुणे : येरवडा परिसरातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची जबाबदारी वनविभाग आणि महापालिका दोघांकडूनही झटकली जात असल्याने येथील वृक्षतोडीवर कोणाचा अंकुशच राहिला नाही. त्यामुळे पक्ष्यांचा निवारा हरविला असून, हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. डॉ. सलीम अली अभयारण्यातील झाडे अमानुषपणे तोडल्याने तिथे येणाऱ्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, दर पाच-सहा महिन्यांनी वृक्षतोड होते. क्लिन रिवर सोसायटीचे अध्यक्ष समीर निकम यांनी सांगितले की, उद्यान विभागाकडे तक्रार दिल्यावर अधिकारी फक्त पंचनामा करतात. पोलिसांत तक्रार नोंदवणे आवश्यक असतानाही कारवाई होत नाही. पूर्वी येथे ५० ते ६० पक्ष्यांचे थवे यायचे, पण नदीतील दूषित पाणी, वृक्षतोड अशा अनेक कारणांमुळे आता पक्षी पाहायला मिळत नाहीत, असे त्यांनी सांगितले.पक्षितज्ज्ञ डॉ. संजीव नलावडे म्हणाले, ‘‘अभयारण्याला वाचवायचे असेल तर महानगरपालिका व वनखात्याने एकत्र येऊन योग्य नियोजन करायले हवे. केवळ पैशांमुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या कामासाठी निधीची गरज आहे. पक्षिप्रेमी, पक्षितज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मार्ग काढला तर नक्कीच सुधारणा होऊ शकतील.’’ वनखात्याच्या ताब्यात हे अभयारण्य असताना पक्षितज्ज्ञांना आणि ज्येष्ठांना बसण्यासाठी बाक होते. कोणत्या प्रकारचे पक्षी इथे येतात त्यांची माहिती व चित्रे फलकावर लावलेली असायची. तसेच २४ तास वनखात्याचा कर्मचारी असल्याने वृक्षतोड व्हायची नाही. (प्रतिनिधी)महानगरपालिकेने पक्षिनिरीक्षकांचा सल्ला घेऊन काम करावे. जंगलांमधील अनेक पक्षी या अभयारण्यात यायचे, पण आता त्यांचं प्रमाण कमी झालंय. हे अभयारण्य पूर्वी कसे होते आणि त्याचे आता काय झालंय, याबद्दलचा अहवाल व २५० पक्षिमित्र, पक्षितज्ज्ञ यांच्या सह्यांचे निवेदन आयुक्तांकडे देणार आहोत. -अनुज खरे (मानद वन्यजीवरक्षक)विविध पक्ष्यांना पाहता यावे, स्थलांतरित पक्ष्यांची ओळख व्हावी या उद्देशाने आम्ही डॉ. सलीम अली अभयारण्यात जायचो. परंतु अनेक कारणांनी तेथील पक्ष्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. हे अभयारण्य काही प्रमाणात दुलर्क्षित झाल्याने येथे बाहेरून लोक दारूपिण्यास येतात. त्यामुळे असुरक्षितता वाढली आहे. जागा संरक्षित करण्याची गरज आहे.- हेमंत धाडनेकर (पक्षिप्रेमी)