शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
2
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
3
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
4
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
5
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
6
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
7
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
8
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
9
अखेर अकरा वर्षांनी निकाल; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
10
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
11
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
12
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
13
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
14
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
15
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
16
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस
17
भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे; मणिशंकर अय्यर यांच्या व्हिडीओने वाद 
18
भारताच्या निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप? : रशियाचा दावा
19
Vinayak Chaturthi 2024: शनिदेवाची अवकृपा टाळायची असेल तर बाप्पाची उपासना करा, कारण...!
20
देवाच्या नावाने मते काय मागता? महागाई, राेजगारावरही आता बाेला! प्रियांका गांधी यांचे मोदींना आव्हान

"हिजाब सारखे मुद्दे निवडणुका जवळ आल्या की तापवले जातात", जावेद अख्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 6:08 PM

ज्यांच्याकडे विरोधाला काही कारण नसते ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडतात

पुणे : ज्यांच्याकडे विरोधाला काही कारण नसते ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडतात. त्याप्रमाणेच कर्नाटक हिजाब वगैरे सारखे मुद्दे पावसाळा जवळ आला की बेडूक कसे बाहेर येतात तसे निवडणुका जवळ आल्या की तापवले जातात. निवडणुका संपल्या की मुद्दे देखील आपोआप संपतात अशी टीका जावेद अख्तर यांनी प्रत्येक गोष्टीला विरोध करणाऱ्या लोकांवर केली आहे. विसाव्या  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला.

''आज माणसे भावनिकदृष्ट्या संवेदनशील होत चालली आहे. आयुष्यात काही विधायक न केलेल्याच व्यक्ती विरोधाचा पवित्रा घेतात. काही न करता लोकांच्या धार्मिक भावना लगेच दुखावतात. नैतिक मूल्यांना धक्का लागला तर भावनादुखावल्याचे कधी ऐकवित आहेत का? ज्यांच्याकडे विरोधाला काही कारण नसते ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडतात, अशा परखड शब्दांत त्यांनी यावेळी विरोधकांना टोला लगावला.'' 

चांगला विषय असेल तर काही वेळा चालवून घ्यायचे किंवा दुर्लक्ष करायचे 

ओटीटी खूप सशक्त माध्यम आहे. जे बोल्ड विषय चित्रपटात येऊ शकत नाहीत ते ओटीटीवर येऊ शकतात. भाषेमध्ये शिव्यांचा भडिमार असला तरी हे माध्यम येण्यापूर्वी शिव्या दिल्याच जात नव्हत्या का?  समाजातही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना आपल्या कानावर एकही शिवी पडत नाही का? समाजात शिव्या दिल्याच जात नाहीत असं तर होत नाही ना? मी त्याचे समर्थन करीत नाही आणि स्वत:ही कधी शिव्या देत नाही. पण चांगला विषय असेल तर काही वेळा चालवून घ्यायचे किंवा दुर्लक्ष करायचे असंही ते म्हणाले. 

...सरकार प्रयत्न करीत आहे

युद्ध ही वेदनादायी आणि दु;खदायक घटना आहे. हा एक राष्ट्रीय मुद्दा आहे. पण युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे असे सांगत अख्तर यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरartकलाcinemaसिनेमाPIFFपीफ