शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाबाबत पाटबंधारे गाफील

By admin | Updated: February 14, 2015 03:04 IST

मागील काही वर्षांमध्ये पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवत असताना पाणीउपशाबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेले नियोजन काही प्रमाणात कामी येत आहे.

अंकुश जगताप, पिंपरीमागील काही वर्षांमध्ये पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवत असताना पाणीउपशाबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेले नियोजन काही प्रमाणात कामी येत आहे. मात्र दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची स्थिती असताना पाटबंधारे विभागाकडून पवना धरणातील जलसाठ्याचे कोणतेच पूर्वनियोजन नसल्याचे उघड झाले आहे. जुनमध्ये पाणी नियोजन करणे म्हणजे तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार सुरू असून, टंचाईकाळातही मुबलक पाण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. पिंपरी - चिंचवडला पाण्यासाठी १९६५ साली मावळ तालुक्यात पवना धरण बांधले. धरणातील पाणी साठवणूक क्षमता ९.६० टीएमसी आहे. यापैकी ८.५१ टीएमसी पाणी वापरायोग्य असून, मृतसाठ्याचे प्रमाण १.०९ टीएमसी आहे. यातून शहरासाठी पवना नदीमार्गे पाणी सोडले जाते. रावेतच्या बंधाऱ्यातून हे पाणी पंपांद्वारे उचलून शुद्धीकरणानंतर शहरभर पुरविले जाते. याच पाण्यावर नदीकाठावरील गावांतील शेती व पाणीयोजनाही अवलंबून आहेत.पावसाळ्याच्या अखेरपासून धरणातूून प्रमाणापेक्षा जादा पाणी सोडल्यास ते नदीप्रवाहावाटे वाया जाण्याचा प्रकार पवना धरणाच्या बाबतीत होत आहे. त्यातच पाऊस लांबल्याने २०१३ मध्ये याचा प्रत्यत येत पाणीकपातीचा शहरवासीयांना आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०१२ साली ३ हजार ५०२ मिलीमीटर, २०१३ साली ४ हजार ५०७ मिलीमीटर, तर २०१४ मध्ये सर्वात कमी २ हजार ३८५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यातून धरण पूर्ण भरले. १२ फेब्रुवारीपर्यंत ५.३० टीएमसी (६२.२७ टक्के) पाणी शिल्लक आहे. इतर भागातून खास शेतीसाठी आवर्तन सोडावे लागत नसल्याने पाणी टिकविणे सोपे असण्याची जमेची बाजू आहे. मात्र कमी पर्जन्यमानामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भागात पाण्याची कमतरता व त्यामुळे वाढत्या मागणीने उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण वाढणार आहे.पावसाळ्याच्या अखेरच्या टप्यात जोरदार पाऊस पडण्याच्या अपेक्षेने सप्टेबर ते आॅक्टोबरमध्ये धरणातील ०.७५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र यानंतर जोरदार पाऊस न झाल्याने पुन्हा अपेक्षीत पाणीसाठा वाढला नाही. सध्या महापालिकेला दररोज ४४० एमएलडी पाण्याची गरज आहे. एमआयडीसीला १२० एमएलडी, पुणे महानगरपालिकेसाठी ३० एमएलडी, तळेगाव नगरपरिषदेसाठी १० एमएलडी पाणी लागते. यासह माण, मारुंजी,हिंजवडी परिसरातील आयटी पार्क, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, शेतीसाठी पाणीवापर संस्था, नदीलगतच्या गावांच्या पेय्यजल योजनाही या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी जलविद्युत प्रकल्पावाटे बाराशे क्युसेक (१२ कोटी लिटर प्रतितास) इतक्या वेगाने ६ ते साडेसहा तास पाणी सोडले जात आहे. त्यातच पावसाळ्यापासून लहरी हवामानाचा प्रत्यय येत आहे. परिणामी या वर्षीचा पाऊस वेळेवर होईल की नाही याबाबत साशंकता आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज व मागणी आणखी वाढणार आहे. या वेळी नदीत पाणीपातळी कायम ठेवणे व त्यासाठी विसर्गात सातत्य गरजेचे आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्याचे रहिवाशांच्या सहभागासह कृती कार्यक्रमासह आतापासूनच नियोजन करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.