शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान; दर भिडले गगनाला; एक जुडी ५० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:03 IST

Pune Vegetables Price Hike: पुणे, नाशिक, मराठवाड्यासह सर्व विभागांत पाऊस झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे

पुणे : राज्यातील सर्व भागांत गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. गेले अनेक दिवसांपासून शहरात जिल्ह्यासह संततधार पावसामुळे मार्केटयार्ड बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्याने सर्व पालेभाज्यांचे (Vegetables) दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

पावसामुळे फळभाज्या, पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्यापासून कमी प्रमाणावर होत असून, सर्व प्रकाराच्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात सोमवारी ८० हजार ते एक लाख जुडी कोथिंबिर, मेथी १० ते १५ हजार जुडी, शेपू ८ ते १० हजार जुडी, राजगिरा ८ ते १० हजार जुडी, कांदापात १० ते १५ हजार जुडी, मुळे ३ ते ४ हजार जुडी अशी आवक झाली. नेहमीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक तशी कमी प्रमाणावर होत आहे. पुणे, नाशिक, मराठवाड्यासह सर्व विभागांत पाऊस झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या खराब होण्याचे प्रमााण जास्त असते. नवीन लागवडीसाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. पालेभाज्यांचे दर महिनाभर तेजीत राहणार आहेत, अशी माहिती सूयर्वंशी यांनी दिली.

भेंडी, राजगिरा महाग

नवरात्रोत्सवात उपवासासाठी भेंडी आणि राजगिऱ्याला मागणी वाढते. भेंडी आणि राजगिऱ्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. किरकोळ बाजारात राजगिऱ्याच्या एका जुडीचे दर ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो भेंडीचे दर १२० ते १६० रुपयांपर्यंत आहेत. गवारीचे दर तेजीत असून, एक किलो गवारीचे दर १४० ते २०० रुपये किलो आहेत, असे किरकोळ बाजारातील पालेभाजी व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

असे आहेत पालेभाज्यांचे जुडीचे दर

पालक - ४० ते ५० रुपयेमेथी - ३० ते ४० रुपयेकोथिंबीर - ३० ते ३० रुपयेराजगिरा - ५० ते ६० रुपये

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Damage Leafy Vegetables; Prices Soar to ₹50 a Bundle

Web Summary : Continuous rains in Maharashtra have severely impacted leafy vegetable crops, causing a shortage in markets. Prices have surged, with a single bundle costing ₹40-50. Supply is low, and prices are expected to remain high for a month. Rajgira and Bhindi prices are also up due to Navratri demand.
टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याfoodअन्नMarathwadaमराठवाडाRainपाऊसweatherहवामान अंदाजWaterपाणीFarmerशेतकरीMONEYपैसा