शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान; दर भिडले गगनाला; एक जुडी ५० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:03 IST

Pune Vegetables Price Hike: पुणे, नाशिक, मराठवाड्यासह सर्व विभागांत पाऊस झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे

पुणे : राज्यातील सर्व भागांत गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. गेले अनेक दिवसांपासून शहरात जिल्ह्यासह संततधार पावसामुळे मार्केटयार्ड बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्याने सर्व पालेभाज्यांचे (Vegetables) दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

पावसामुळे फळभाज्या, पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्यापासून कमी प्रमाणावर होत असून, सर्व प्रकाराच्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात सोमवारी ८० हजार ते एक लाख जुडी कोथिंबिर, मेथी १० ते १५ हजार जुडी, शेपू ८ ते १० हजार जुडी, राजगिरा ८ ते १० हजार जुडी, कांदापात १० ते १५ हजार जुडी, मुळे ३ ते ४ हजार जुडी अशी आवक झाली. नेहमीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक तशी कमी प्रमाणावर होत आहे. पुणे, नाशिक, मराठवाड्यासह सर्व विभागांत पाऊस झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या खराब होण्याचे प्रमााण जास्त असते. नवीन लागवडीसाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. पालेभाज्यांचे दर महिनाभर तेजीत राहणार आहेत, अशी माहिती सूयर्वंशी यांनी दिली.

भेंडी, राजगिरा महाग

नवरात्रोत्सवात उपवासासाठी भेंडी आणि राजगिऱ्याला मागणी वाढते. भेंडी आणि राजगिऱ्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. किरकोळ बाजारात राजगिऱ्याच्या एका जुडीचे दर ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो भेंडीचे दर १२० ते १६० रुपयांपर्यंत आहेत. गवारीचे दर तेजीत असून, एक किलो गवारीचे दर १४० ते २०० रुपये किलो आहेत, असे किरकोळ बाजारातील पालेभाजी व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

असे आहेत पालेभाज्यांचे जुडीचे दर

पालक - ४० ते ५० रुपयेमेथी - ३० ते ४० रुपयेकोथिंबीर - ३० ते ३० रुपयेराजगिरा - ५० ते ६० रुपये

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Damage Leafy Vegetables; Prices Soar to ₹50 a Bundle

Web Summary : Continuous rains in Maharashtra have severely impacted leafy vegetable crops, causing a shortage in markets. Prices have surged, with a single bundle costing ₹40-50. Supply is low, and prices are expected to remain high for a month. Rajgira and Bhindi prices are also up due to Navratri demand.
टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याfoodअन्नMarathwadaमराठवाडाRainपाऊसweatherहवामान अंदाजWaterपाणीFarmerशेतकरीMONEYपैसा