शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:20 IST

पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचा चांगलाच फटका बसला आहे. मका, टोमॅटो, शेवगा, पेरू, डाळिंब, भोपळा, कारले आणि पालेभाज्यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे भुईसपाट झाली असून, काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निमगाव केतकी परिसरातील व्याहळी, कौठळी, कचरवाडी, गोतोंडी, शेळगाव, वरकुटे खुर्द, रामकुंड आदी गावांमध्ये १४ सप्टेंबरच्या रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली. विशेषतः मुरघासासाठी कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भोपळा आणि कारले या पिकांसाठी उभारलेले स्टेजिंग पावसाच्या जोरदार तडाख्याने कोसळले, ज्यामुळे सुमारे दोन एकर क्षेत्रातील पिके नष्ट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कचरवाडी (निमगाव केतकी) येथील शेतकरी परशुराम बरळ म्हणाले, “परतीच्या पावसाने आमचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शेतात उभी असलेली पिके आणि स्टेजिंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी सांगितले, “तालुक्यात परतीचा पाऊस झाला असून, काही गावांमध्ये ओढ्यालगतच्या शेतांमध्ये पाणी साचले आहे. ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे, तिथे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली जातील.” सध्या परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण आहे तर रात्री पावसाचा जोर वाढत आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदत आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरFarmerशेतकरीMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRainपाऊस