शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

Pune: शहरातील ओढे, झरे बंद केले तर पाण्याने जायचे कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 10:09 IST

महापालिका आणि नागरिक दोघांनी मिळून संवेदनशीलता दाखवून याविषयी काम करायला हवे...

- श्रीकिशन काळे

पुणे : शहरात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरते आणि रस्तेही पाण्याखाली जातात. त्यात प्रचंड नुकसान होते. शहरात सिमेंटीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पावसाच्या पाण्याला वाहण्यासाठी असणारे मार्ग, झरे, ओढे, नाले बंद झाले आहेत. काही बुजविले आहेत. त्यामुळे पाण्याला भूगर्भात जाण्यासाठी पर्यायच राहिला नाही. परिणामी, रस्त्यावर पाणी येत असून, त्यामुळेच पूरस्थिती निर्माण होत आहे. महापालिका आणि नागरिक दोघांनी मिळून संवेदनशीलता दाखवून याविषयी काम करायला हवे, अशी अपेक्षा जलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केली.

शहरात आता दरवर्षी पावसाळ्यात शहरात कुठे ना कुठे पूरस्थिती निर्माण होत आहे. त्याविषयी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पाणलोट क्षेत्रात पडणारे पाणी हे अडविणे, जिरवणे आवश्यक असते. त्यातील काही पाणी वाहून जाते. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यापैकी ५ टक्के पाणी जमिनीत जिरत असते. जर तिथे तशी परिस्थिती असेल तरच ते जिरते, अन्यथा ते पाणी वाहून जाते. दुसरीकडे धरणे, बंधारे बांधून पाणी अडविले जाते. इतर जे पाणी आहे त्याला वाहायला रस्ता हवा असतो. नदी, ओहोळ, ओढा, झरे यातून पाणी वाहत असते. पण, हे मार्ग गेल्या काही वर्षांत बुजविले गेले आहेत. म्हणून पावसाचे पाणी रस्त्यावरच येत आहे. पाण्याला नैसर्गिक मार्ग राहिले नसल्याने पाण्याची पातळी वाढून रस्ते पाण्याखाली जात आहेत. हे आता सातत्याने होणार आहे. कारण शहरीकरणामुळे आपण पाण्याचे अनेक मार्ग बंद केले आहेत.

पुणे हे चढ-उतारावर वसलेले शहर आहे. इथे तलाव, नदी, ओढे, झरे आहेत. पण, त्यांची रचना शहरीकरणामुळे बदलली आहे. पुण्याच्या माथ्यावर म्हणजे पानशेत, मावळ, मुळशी या परिसरात दरवर्षी साधारणपणे दीड ते दोन हजार मिमी पाऊस पडतो. माथ्यावरून येणारे पाणी शहराकडेच येते आणि शहरात दरवर्षी साधारणपणे ८०० मिमी पाऊस पडतो. ही गोष्ट कोणी विचारातच घेत नाही, असे धोंडे यांनी सांगितले.

यावर उपाय काय?

प्रशासन व समाज संवेदनशील असायला हवा, जो आता नाही. दोघांची संवेदनशीलता परत आणायला हवी. जे आता नदीविषयी जागरूक आहेत, त्या संवेदनशील लोकांनी एक दबाव गट तयार करावा. जो पाण्याचे नैसर्गिक अस्तित्व जपेल. शहरातील नैसर्गिक स्रोत पुन्हा जीवंत केले पाहिजेत.

खूप वर्षांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर इमारती नव्हत्या. तेव्हा शहरभर ठिकठिकाणी २५६ झरे होते. आता मात्र ५६ देखील जीवंत राहिले नाहीत. सर्व गायब झाले आहेत. या झऱ्यांत जाणारे पाणी रस्त्यावरच राहत आहे. हे सर्व झरे पुनर्जीवित केले पाहिजेत.

- उपेंद्र धोंडे, भूजलवैज्ञानिक

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस