शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाेलवा टाेलवी ; अजित पवारांचा अाराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:03 IST

भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत असल्याचा अाराेप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला अाहे.

पुणे: राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत आहे.तसेच केवळ भावनिक मुद्यांना हात घालून निवडणूका लढविण्याचे काम सत्ताधा-यांकडून सुरू आहे,अशी टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली. तसेच कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचाही पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

   राज्यात परतीचा पाऊस न पडल्यामुळे अनेक जिल्ह्यात व तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असूनही राज्य शासनातर्फे दुष्काळ जीहीर केला जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पवार म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला निधी कमी पडू देणार नाही,अशी घोषणा शिर्डीतील कार्यक्रमात केली. मात्र,केंद्राच्या समितीने पाहणी केल्यानंतरच दुष्काळ जाहीर केला जाईल,असे राज्य शासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. मात्र, राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्यावी. तसेच प्रत्येक शेतक-याला तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत करावी. बेरोजगारांना रोजगार द्यावा. अघोषित भारनियमन बंद करावे,आदी मागण्यांचे निवेदन पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांना दिले जाणार आहे. कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी केला आहे.मात्र,सत्तेत असणा-या सत्ताधारी पक्षाने असा आरोप करणे योग्य नाही.शिवसेनेच्या नेत्यांनी याचा जाब विचारणे आवश्यक आहे,असेही पवार म्हणाले.  

धमक असेल तर उद्धव ठाकरेंनी राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी : अजित पवार

जलयुक्त शिवार योजनेतील भष्टाचार भाजप सरकारच्या वतीने टँकरमुक्त महाराष्ट्राची वल्गना करण्यात आली.त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र,जलयुक्त शिवारची कामे झाली त्याच ठिकाणी भूगर्भातील पाणी पातळी एक ते दीड मिटरने कमी झाली असल्याचा अहवाल शासनाच्याच भूजल सर्वेक्षण विभागाकडून दिला जात आहे.त्यामुळे शासनाचे जलयुक्त शिवार अभियान पूर्णपणे अपयश आहे. कुठे भ्रष्टाचार झाला याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे.दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहुर्त काढायचा आहे का? महाराष्ट्रात या पुढील काळात पाऊस पडणार नाही,असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने कोणाचीही वाट न पहाता दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कर्नाटक सरकारकडून कर्नाटक राज्यात दुष्काळ जाहीर केला जात असले तर महाराष्ट्रात दुष्काळ केला जात नाही,असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच दुष्काळी परिस्थितीत शासन शेतक-यांना मदत का करत नाही? सरसकट कर्जमाफी का देत नाही, असा सवाल उपस्थित करून भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारे,खोटे बोलणारे आणि लोकांना गाजर दाखविणारे सरकार असल्याची टिका पवार यांनी केली. तसेच जुन्नर ,खटाव सारखे अनेक तालुके दुष्काळी असूनही त्यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश केला जात नसल्याबद्दल आक्षेप नोंदवला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाdroughtदुष्काळ