शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाेलवा टाेलवी ; अजित पवारांचा अाराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:03 IST

भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत असल्याचा अाराेप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला अाहे.

पुणे: राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत आहे.तसेच केवळ भावनिक मुद्यांना हात घालून निवडणूका लढविण्याचे काम सत्ताधा-यांकडून सुरू आहे,अशी टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली. तसेच कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचाही पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

   राज्यात परतीचा पाऊस न पडल्यामुळे अनेक जिल्ह्यात व तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असूनही राज्य शासनातर्फे दुष्काळ जीहीर केला जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पवार म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला निधी कमी पडू देणार नाही,अशी घोषणा शिर्डीतील कार्यक्रमात केली. मात्र,केंद्राच्या समितीने पाहणी केल्यानंतरच दुष्काळ जाहीर केला जाईल,असे राज्य शासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. मात्र, राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्यावी. तसेच प्रत्येक शेतक-याला तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत करावी. बेरोजगारांना रोजगार द्यावा. अघोषित भारनियमन बंद करावे,आदी मागण्यांचे निवेदन पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांना दिले जाणार आहे. कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी केला आहे.मात्र,सत्तेत असणा-या सत्ताधारी पक्षाने असा आरोप करणे योग्य नाही.शिवसेनेच्या नेत्यांनी याचा जाब विचारणे आवश्यक आहे,असेही पवार म्हणाले.  

धमक असेल तर उद्धव ठाकरेंनी राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी : अजित पवार

जलयुक्त शिवार योजनेतील भष्टाचार भाजप सरकारच्या वतीने टँकरमुक्त महाराष्ट्राची वल्गना करण्यात आली.त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र,जलयुक्त शिवारची कामे झाली त्याच ठिकाणी भूगर्भातील पाणी पातळी एक ते दीड मिटरने कमी झाली असल्याचा अहवाल शासनाच्याच भूजल सर्वेक्षण विभागाकडून दिला जात आहे.त्यामुळे शासनाचे जलयुक्त शिवार अभियान पूर्णपणे अपयश आहे. कुठे भ्रष्टाचार झाला याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे.दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहुर्त काढायचा आहे का? महाराष्ट्रात या पुढील काळात पाऊस पडणार नाही,असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने कोणाचीही वाट न पहाता दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कर्नाटक सरकारकडून कर्नाटक राज्यात दुष्काळ जाहीर केला जात असले तर महाराष्ट्रात दुष्काळ केला जात नाही,असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच दुष्काळी परिस्थितीत शासन शेतक-यांना मदत का करत नाही? सरसकट कर्जमाफी का देत नाही, असा सवाल उपस्थित करून भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारे,खोटे बोलणारे आणि लोकांना गाजर दाखविणारे सरकार असल्याची टिका पवार यांनी केली. तसेच जुन्नर ,खटाव सारखे अनेक तालुके दुष्काळी असूनही त्यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश केला जात नसल्याबद्दल आक्षेप नोंदवला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाdroughtदुष्काळ