शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घोटवडेत रिंगरोडला विरोध; जमिनीच्या मोबदल्यात जमिनीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST

--- घोटवडे : घोटवडे व मातेरेवाडी प्रकल्पामध्ये भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी मिळावी, भूसंपादन व मोबदला ...

---

घोटवडे : घोटवडे व मातेरेवाडी प्रकल्पामध्ये भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी मिळावी, भूसंपादन व मोबदला मिळावा, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे, तर काहींनी जमिनीच्या मोबदल्यात जमीन मिळावी व शाळेची इमारत पडत असेल गावात प्रदूषण होत असेल तर जमिनी देणारच नाही, अशी विरोधाची भूमिका घेतली आहे.

घोटवडे (ता. मुळशी) येथे महाराष्ट्र्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंगरोडसंबधी प्रकल्पग्रस्त शेतकरी व मावळ, मुळशी उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांची बैठक झाली. तीत प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मुळशी तहसीलदार अभय चव्हाण, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रताप चौधरी, घोटवडे मंडल अधिकारी राजेंद्र गायकवाड, गावकामगार तलाठी स्नेहल दिवटे ,भूकरंमापक बापू भारती ,व शेतकरी ,गंगाराम मातेरे ,भिमाजी केसवड ,नवनाथ भेगडे ,संतोष गोडाबे ,संभाजी गोडाबे ,राजाराम शेळके ,बाजीराव धुमाळ, हनुमंत घोगरे ,आनंद घोगरे ,बाळासाहेब खाणेकर, उत्तम गोडाबे ,नीलेश मातेरे, लक्ष्मण काणगुडे ,योगेश शेळके, अशोक वायकर ,संदीप कुंभार इत्यादी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी म्हणाले की, भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटूंबातील एकास नोकरी मिळावी, पिकाच्या जमिनी जात असल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल, रस्त्यामुळे जमिनीचे दोन तुकडे झाल्याने जमीन कसने अवघड होईल. त्यामुळे आम्हास पैसे नकोत जमिनी बदल्यात जमिनी मिळाव्यात. काही शेतकऱ्यांनी तर शाळेची इमारत या भूसंपदानात जात असेल आणि गावात प्रदुषणाची वाढ होईल आदी गोष्टींमुळे जमिनी देणारच नाही प्रसंगी आत्मदहन करु पण जमिनी देणार नाही असे सांगितले. त्यावर प्रांताधिकारी म्हणाले की, पुनर्वसन कायद्याप्रमाणे गावे प्रकल्पग्रस्त होतात तेव्हा जमिनी दिल्या जातात परंतु भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला दिला जातो. त्यामुळे या भुसंपादन प्रक्रियेत जमिन मिळणे कठीण आहे. मात्र तरी जी ज्या शेतकऱ्यांचा विरोध असले त्यांनी लेखी म्हणणे द्यावे, ते म्हणशे शासनाकडू पाठवून त्यावर शासन निर्णय शेतकऱ्यांना कळविले जाईल.

--

चौकट

विरोध करणाऱ्यांना चार पट इतरांना पाच पट मोबदला देणार

--

भूसंपादन विषयी माहिती देताना शिर्के म्हणआले की, प्रथम मोजणी होईल, त्यानतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हरकतीवर सुनावणी होईल. शासकीय अधिकारी निर्णय देतील व मोबदला देताना रेडिरेकनर दर आणि बाजारभाव यामध्ये जे जास्त असेल त्याच्या पाच पट मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल. परंतु विरोध करणाऱ्या खातेदारांना चार पट तर इतरांना पाच पट मोबदला मिळेल. बाधित जमिनीवरील मिळकती त्यात घरे, गोठे, पोल्ट्री शेड, फळझाडे, इत्यादी बाबीचा शासनामार्फत मूल्याकन होऊन मोबदला मिळेल. व्यवहार खरेदीखताने होईल व ७/१२ प्रमाणे खासतेदारांना धनादेश लगेच मिळेल. ज्याच्या तक्रारी असतील त्यावर योग्य निर्णय देऊ जे खातेदार निर्णय मान्य न करता कोर्टात जातील त्याचा निर्णय कोर्ट देईल व आम्ही त्याचे धनादेश कोर्टात पाठवू व निर्णयानंतर कोर्ट सव्याज मोबदला त्याना देईल. हा रस्ता बंदिस्त असून गाव वाड्या वस्त्याना अंडर पास व गावांना रस्ते असतील.