शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाशी लागला लळा अन् भीती निघून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : किर्रर्र झाडी, दुर्गम भाग, वन्य प्राण्यांचा वावर आणि वणव्यांपासून येणारी संकटे या पार्श्वभूमीवर कार्यरत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : किर्रर्र झाडी, दुर्गम भाग, वन्य प्राण्यांचा वावर आणि वणव्यांपासून येणारी संकटे या पार्श्वभूमीवर कार्यरत वन रागिणींनी थरारक अनुभवांना वाट करून दिली.

निमित्त होते ‘तेर पॉलिसी सेंटर’ आयोजित महिला दिनानिमित्त संवाद ‘वन रागिणींशी’या कार्यक्रमाचे. गोंदिया कृषी विभागाच्या सहायक संचालक प्रणाली चव्हाण, गीता बेलपत्रे (फायर फ्री फॉरेस्ट मिशन ,मेळघाट टायगर रिझर्व्ह), स्मृती उपाध्याय (फॉरेस्ट गार्ड, बांधवगड टायगर रिझर्व्ह), राणी गरुड (मेळघाट टायगर रिझर्व्ह), लक्ष्मी मेरावी (कान्हा टायगर रिझर्व्ह), प्रिया वरेकर (वाईल्ड लाईफ रिसर्चर ,कान्हा टायगर रिझर्व्ह), हिर्मेलीन बेयपी (सामाजिक कार्यकर्ता, आसाम) या महिला वन विभाग कर्मचारी तसेच संशोधक या संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्या. ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम झाला. ‘तेर पॉलिसी सेंटर’चे प्रकल्प समन्वयक सचिन अनपट यांनी त्यांच्याशी संवाद साधला तर ‘सेंटर’च्या संचालक डॉ. विनीता आपटे यांनी प्रास्ताविक केले.

गोंदिया येथील प्रणाली चव्हाण म्हणाल्या, की अजूनही दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न करून देण्याचा घाट घातला जातो. वनसेवेत दाखल झाल्यावर नक्षलवादी सीमांवर देखील काम करावे लागले. “जंगलात कधीही वन्य प्राणी समोर येऊ शकतात. अशा वेळी डोळे, नाक, कान उघडे ठेवून काम करावे लागते,” असे बांधवगड अभयारण्यात कार्यरत स्मृती उपाध्याय यांनी सांगितले. प्राण्यांना वाचविणे देखील आव्हानात्मक असते. बछड्यांना प्रेमाने दूध पाजणारी, खेळणारी वाघीण पाहण्याचे भाग्यही मला मिळाले, असे त्या म्हणाले.

गीता बेलपात्रे म्हणाल्या की, मेळघाटात जलसंधारणाचे काम आम्ही करीत आहोत. वणवे लागू नये याची जागृती आम्ही करीत आहोत. कान्हा राष्ट्रीय अभयारण्यात फॉरेस्ट गार्ड म्हणून कार्यरत लक्ष्मी मेरावी म्हणाल्या, “२००५ पासून वन खात्यात काम सुरु केले. लहानपणापासून जंगलाशी जिव्हाळा असूनही वन्य प्राण्यांबद्दल सुरुवातीला भीती वाटत होती. ती हळहळू निघून गेली. रानकुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचले, हा अविस्मरणीय क्षण होता.

राणी गरुड म्हणाल्या की, गस्त घालताना सोबत हत्यारे असतात असेही नाही. रात्री अपरात्री लागणाऱ्या आगी नियंत्रित करणे हेही आव्हानात्मक असते. कान्हा अभयारण्यात कार्यरत संशोधक प्रिया वारेकर म्हणाल्या, “नेहमीप्रमाणे ११ ते ५ कामाच्या चाकोरीत मला रस नव्हता. संशोधन ही वाट आवडीची होती. साप, वाघ वाचविणे हे ध्येय ठेवून आम्ही काम करीत असतो

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र शेंडे म्हणाले, “वन खात्यात आणि संबंधित उपक्रमात कार्यरत महिलांच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. महिला अधिक उत्तमपणे वन संरक्षणाचे काम करीत आहेत. आपण निसर्गापासून दूर चाललो आहोत. जंगल, हवा, शुद्ध पाणी, शुद्ध हवा या गोष्टी अनमोल आहेत. एकत्रित प्रयत्नांनी आपण निसर्गाला जपू शकतो.”