शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला बालगंधर्वांचा विसर

By admin | Updated: June 26, 2017 04:06 IST

बालगंधर्व रंगमंदिराच्या उत्तम वास्तूतून आपल्याला पन्नास वर्षे कलेचा आस्वाद घेता आला आहे. रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या उत्तम वास्तूतून आपल्याला पन्नास वर्षे कलेचा आस्वाद घेता आला आहे. रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. कारण, हे रंगमंदिर पालिकेने उभारले आहे. मात्र महापालिकेला बालगंधर्वांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे, अशी खंत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला; तसेच ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी बालगंधर्व परिवाराचे मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, खासदार अनिल शिरोळे, महानगरपालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे, सिद्धार्थ शहा, सुधीर मांडके, अंकुश काकडे, दीपक साळुंखे, कृष्णकुमार गोयल, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मोरे यांनी आभार मानले.शरद पवार म्हणाले, बालगंधर्व रंग मंदिर व्हावे, यासाठी प्रयत्न केलेले अनेक मानकरी आहेत. पुलंच्या दूरदष्टीने आणि विचाराने हे सुंदर सभागृह उभा राहिले. त्यांनी कलाकारांची सोय पाहिली. त्यामुळे गेली ५० वर्षे आपल्याला या वास्तुतून कलेचा आस्वाद घेता आला. बालगंधर्व रंगमंदिराच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकावरून वाद सुरू होता. त्या वेळी यशवंतराव चव्हाण तेव्हा नेमके पुण्यात होते. मी त्यांना ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाला बालगंधर्वमध्ये घेऊन आलो. या नाटकाने महाराष्ट्रात पगडा निर्माण केला होता. ते केवळ राज्यापुरते उरले नव्हते. नंतर मला एकदा आमचे गुरू नरूभाऊ लिमये भेटले. ते म्हणाले की, तुला काही कळते का? तू यशवंतरावांना त्या नाटकाला का घेऊन गेलास? जुन्या पिढीतील लोकांना अनेक गोष्टी मान्य नसायच्या. जब्बारने मेहनतीने हे नाटक केले. भालबा केळकर यांनी पीडीए संस्थेच्या माध्यमातून अनेक उत्तम नाटके रंगभूमीला दिली, असेही ते म्हणाले.रोहिणी हट्टंगडी यांचा गौैरव करताना पवार म्हणाले, ‘रोहिणीतार्इंनी सशक्त अभिनयाची छाप उमटवली. अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या. रिचर्ड अ‍ॅटोनबोरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटात कस्तुरबाजींची व्यक्तिरेखा रोहिणीतार्इंनी कौशल्याने साकारली. आपल्या कलेशी समरस होऊन वर्षानुवर्षे दर्जा सांभाळून आणि रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवून सातत्याने यश मिळवणे अवघड काम आहे. ते रोहिणीतार्इंनी केले आहे. हट्टंगडी दाम्पत्याने कलेची सेवा केली आहे. दिल्लीत वेगळ्या घडामोडी सुरू असतानाही, मी रोहिणीतार्इंचा सत्कार करायचा आहे, असे सांगून आलो आहे.’