शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हिवरे येथील शेतकऱ्यांचा रेल्वे प्रकल्पाला तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

खोडद : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

खोडद : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असून, सुमारे ९९ शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. दरम्यान, हिवरे हद्दीत रेल्वे प्रकल्पासाठी चालू असलेले सर्वेक्षणाचे कामदेखील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.

याबाबत माहिती अशी की, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हिवरे गाव व परिसरातून जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी सुमारे २५ हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र याबाबत शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस बजावण्यात आलेली नाही.

दरम्यान, हिवरे गावातील सुमारे ९९ शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी विरोध केला असून, याबाबत त्यांनी हरकतीचे निवेदन प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांना दिले आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या शेतजमिनी घेऊन आम्हांला भूमिहीन करू नका, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी संजय भोर, अवधूत बारवे, विलास खोकराळे, सुभाष खोकराळे, शिवदास खोकराळे, सुरेश शिंदे, संतोष खोकराळे, विशाल भोर यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिवरे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना पुनर्वसनाचे शेरे असून, त्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवल्या आहेत. यामुळे आधीच अनेकांचे क्षेत्र कमी झालेले आहे. त्यात हा प्रकल्प येथून गेल्यास शेतकरी अधिक अल्पभूधारक होणार आहेत. हिवरे परिसरातील शेतजमिनी बारमाही बागायती आहेत. द्राक्ष, ऊस,टोमॅटो,पपई, सीताफळ,डाळिंब,भाजीपाला अशी नगदी पिके घेतली जातात. हिवरे परिसरातील अनेक शेतकरी हे नोकरीला नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच आहे.

या परिसरातून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पामुळे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते भूमिहीन होणार आहेत. तर काही शेतकरी अल्पभूधारक होणार आहेत.तसेच या प्रकल्पामुळे प्रामुख्याने येथील शेतीचे असंख्य तुकडे होणार आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांची शेती वरच उपजीविका आहे आणि शेती हेच उपजीविकेचे एकमेव साधन आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँकांचे कर्ज देखील घेतलेली आहेत.अनेक शेतकऱ्यांना अत्यंत कमी शेत जमीन आहे.येथून जाणाऱ्या रेल्वेमुळे येथील शेतकरी हे उघडे होणार आहेत, म्हणून येथील शेतकऱ्यांचा या रेल्वेप्रकल्पाला तीव्र विरोध आहे

हिवरे तर्फे नारायणगाव येथून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असून याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांना दिले.