शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

राजगुरुनगर बाजारात शेतकऱ्यांनाच मिळेना जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 1:37 PM

रस्त्यावर बसण्याची वेळ : वाहतुकीस होतोय अडथळा

ठळक मुद्दे राजगुरुनगर शहरात घडई मैदानात भरणारा आठवडेबाजार तर मोठी डोकेदुखी बाजारात २५ टक्के मोक्याची जागा पाटीधारक शेतकऱ्यांसाठी आरक्षित ठेवणे गरजेचे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांकडून नगर परिषदेचे कर्मचारी पाटीमागे आकारतात २० रुपये शुल्क

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरातील भाजीबाजार पाटीधारक शेतकऱ्यांची मोठी समस्या बनली आहे. बाजारातील व्यापाºयांनी व्यापलेल्या जागांमुळे शेतकऱ्यांना बसण्यास जागाच मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावर बसतात; त्यामुळे वहातुकीचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे.शेतकरी मेथी, कोथिंबिरीच्या जुड्या संध्याकाळी राजगुरुनगर मंडईत विकण्यासाठी आणतात. मात्र, बसण्यासाठी बाजारात जागाच नसते. नाइलाजास्तव रस्त्याच्या कडेला बसावे लागते.कधी कधी पोलीस, नगर परिषदेचे कर्मचारी येतात आणि पाटी फेकून देतात. आम्ही बसायचे कुठे, याचे कुणीच उत्तर देत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. राजगुरुनगर शहरात घडई मैदानात भरणारा आठवडेबाजार तर मोठी डोकेदुखी ठरत आहे. पाटीधारक शेतकरी सर्व रस्ताच व्यापून टाकत आहेत. भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक व त्यांच्या दुचाकी गाड्यांमुळे वाहतूककोंडीत मोठी भर पडते. दर रविवारीनगर परिषदेशेजारी भरणारा भाजीबाजार पूर्ण परिसर व्यापून टाकत आहे.सध्या शेतात चांगला हिरवागार भाजीपाला होत असल्याने शेतकरी हात विक्रीसाठी बाजारात येत आहेत. त्याचप्रमाणे जुना मोटार स्टँडवर राजगुरू मंडई आणि टिळक चौकात नगर परिषदेशेजारी रोज बाजार भरतो. गडई मैदानावर फक्त शुक्रवारी आठवडेबाजार भरतो. बाकी ठिकाणी दररोज बाजार भरतात. राजगुरुनगर शहराची लोकसंख्या लाखापर्यंत जाऊन भिडली आहे. वाढत्या लोकसंखेच्या तुलनेत या तिन्ही ठिकाणी बाजारांच्या जागा पुरत नाहीत. बाजारातील सर्व मोक्याच्या जागा व्यापाºयांनीच अडवून ठेवलेल्या असतात. त्यामुळे राजगुरुनगर परिसरातून आलेल्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. गडई मैदानावरील आठवडेबाजार बऱ्याचदा पोलीस चौकीपर्यंत जातो. तिथे कचऱ्याच्या दुर्गंधीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते...............पोलिसांच्या कारवाईत पाटीधारक शेतकरीच बळी पडतात. व्यापाऱ्यांनी प्रमाणापेक्षा जास्त लाटलेल्या जागांबाबत कुणीच काही बोलत नाही. बाजार समितीच्या नियमानुसार बाजारात २५ टक्के मोक्याची जागा पाटीधारक शेतकऱ्यांसाठी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांचे मात्र हाल सुरू आहेत.

.रविवारी बाजाराला तुडुंब गर्दीनगर परिषदेजवळील बाजार तर रविवारी तुडुंब भरतो. पश्चिमेला गुरांचा दवाखाना, दक्षिणेला तहसील कार्यालय, तर पूर्वेला जैन स्थानकापर्यंत सर्व रस्त्यांवर पसरतो. नेहमीच्या मधल्या जागेतील जागा व्यापाऱ्यांनी अडविल्यामुळे तिथे शेतकऱ्यांना बसण्यास जागाच नसते. रविवारी स्थानिक रहिवाशांना रस्त्याने गाड्या घेऊन घरी जाता-येता येत नाही. राजगुरू मंडईतही व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना आत जागा नसल्याने शेतकरी वाडा रस्त्यातील पुलावर बसतात. 

हा रस्ता रहदारीचा असल्याने संध्याकाळी वहातुकीची प्रचंड कोंडी होते. शेतकऱ्यांनी कुठे बसायचे, हा प्रश्न निर्माण होतो. ...............बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांकडून नगर परिषदेचे कर्मचारी पाटीमागे २० रुपये शुल्क आकारतात. भाज्यांचे भाव पडल्यावर पाटीतील मालाचे शंभर रुपयेसुद्धा मिळत नाहीत. मात्र, त्यांना हे जाचक शुल्क द्यावे लागते. त्या प्रमाणात शेतकऱ्यांना कुठलीच सुविधा मिळत नाही. जास्त जागा अडविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या तुलनेत खूपच कमी शुल्क आकारले जाते.

टॅग्स :KhedखेडFarmerशेतकरीPoliceपोलिस