शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डेहणे : खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डेहणे : खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे भात पिकांचे झाले आहे. या नुकसानग्रस्थ भागाची पाहणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पासनरे यांनी केली. या सोबतच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली. लवकरतात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आवाहन त्यांनी केले.

अतिवृष्टीमुळे खेडचा पश्चिम भाग जलमय झाला आहे. ठिक ठिकाणी ताली, बांध वाहुन गेले तर अनेक पुल तुटले आहेत. त्यांचे भराव वाहुन गेले आहेत. नायफड येथील मोठा बंधारा फुटल्याने शेकडो एकर शेती वाहुन गेली आहे. भोरगीरी येथील अनेक बांध फुटले असुन जमीन वाहुन गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. धुवोली, पाबे, भिवेगाव, टोकावडे, वांजाळे, डेहणे येथील शेती चे पुरामळे नुकसान झाले आहे.

मंदोशी - जावळेवाडी (ता. खेड) या दोन गावांना जोडणारा रस्ता मोरी वाहून गेल्याने जावळेवाडीचा संपर्क तुटला आहे. घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेत हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून दळणवळणास खुला करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तसेच तालुकास्तरावर संबंधीत अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

याप्रसंगी माजी सभापती अरुण चांभारे, सुजाता पचपिडं, जिल्हा दूध संघाचे संचालक लक्ष्मण तिटकारे, किरण वांळुज, सरपंंच बबन गोडे,सरपंंच दत्ता खाडे, बांधकाम विभागाचे अधिकारी एल बी जोशी, सार्वजनिक बांधकाम अभियंता मधुकर भिंगारदेवे, ग्रामसेवक लेडें व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : मंदोशी-जावळेवाडी (ता. खेड) येथे वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे.

फोटो : खेड तालुक्यातील नुकसानग्रस्थ भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देतांना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि कृषी आणि पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर.