शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या निर्यातीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST

शेतकरी संघटनेची मागणी अन्यथा शेतकरी, कामगारांना भूर्दंड सहन करावा लागणार शेतकरी संघटनांची मागणी: उत्पादकांना भुर्दंड सहन करावा लागणार बारामती: ...

शेतकरी संघटनेची मागणी

अन्यथा शेतकरी, कामगारांना

भूर्दंड सहन करावा लागणार

शेतकरी संघटनांची मागणी: उत्पादकांना भुर्दंड सहन करावा लागणार

बारामती: साखर निर्यातीस दोन महिने उशीर झालेला आहे. जागतिक बाजार भारताच्या साखरेची वाट पाहत आहे. या परिस्थितीचा फायदा लगोलग उचलला नाहीतर येत्या दोन तीन महिन्यामध्ये जागतिक बाजारात ब्राझिलची साखर उपलब्ध होईल, याचा थेट फटका ऊस उत्पादकाला बसणार आहे. साखरेच्या निर्यातीचा निर्णय केंद्र सरकार घेत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी व साखर कामगारांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीस केंद्र सरकारने तातडीने परवाणगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, यंदा देशात ३२० लाख मे. टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. मागील वर्षाचा २२ लाख मे. टन साखरसाठा उपलब्ध आहे. याचाच अर्थ चालू साखर हंगाम संपल्यानंतर तो ३८२ लाख मे. टन इतका होऊन देशाची गरज २५० लाख मे टनाची असून म्हणजे हा हंगाम संपल्यानंतर १३२ लाख मे टन साखरसाठा शिल्लक राहील. तो देशाच्या गरजेच्या ६० टक्के इतका आहे. पुढील हंगाम सन २१-२२ मध्ये सुद्धा साखरेचा हंगाम बंपर उत्पादन घेण्याचा आहे. सन १९९७ पर्यंत जागतिक बाजारात साखरेची निर्यात करणारा भारत देश प्रमुख होता. अनेक जगातील राष्ट्रे आपल्या साखरेची कायम स्वरूपी ग्राहकदेश होते. परंतु, नंतर आपण निर्यात बंद करून आपण उलटपक्षी गरज नसताना साखरेची आयात केलेली आहे. त्यामुळे देशातील ऊस उत्पादकांना व साखर कामगारांना त्याचा भूर्दंड सोसावा लागलेला आहे. निर्यात साखर न झालमुळे देशात साखरेचे दर पडे राहतील. साखर साठ्यावरील कर्ज - व्याज काढणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व साखर कामगार यांचे न भरून येणारे नुकसान होणार आहे.

चौकट..................

साखर कारखानदारी अडचणीत

साखर निर्यातीबाबत महाराष्ट्र शासन, साखर संघ, कारखानदार , वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट केंद्र सरकारवर दबाव आणत नाहीत. आघाडी सरकारमधील अनेक आमदार, मंत्र्यांचे साखर कारखाने असून बरेच मंत्र्यांचे खासगी कारखाने सुद्धा आहेत. वास्तविक ही परिस्थिती मुद्दामहून गांभीर्याने घ्यायची नाही. भविष्यात ऊस उत्पादक तसेच साखर कामगारांचा असंतोष वाढून त्याचा फायदा आपल्यास होईल. तसेच महाराष्ट्रातील विरोधीपक्ष सुद्धा या विषयावर बोलत नाहीत. लवकरात लवकर उपाय योजना न केल्यास साखर उद्योग अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.