शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

दर्जेदार संशोधनातून वाढेल शैक्षणिक दर्जा - डॉ. शां. ब. मुजुमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 2:21 AM

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच दर्जेदार संशोधनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी वाव मिळणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच दर्जेदार संशोधनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी वाव मिळणार आहे. अभ्यासक्रम तयार करण्याबाबत यूजीसीच्या नियमावलीमुळे काही बंधने येत होती. मात्र, स्वायत्तता मिळाल्यामुळे विद्यापीठांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे शक्यहोणार आहे. विविध औद्योगिक कंपन्यांना आवश्यक असणारे मन्युष्यबळ त्यातून उपलब्ध करून देता येऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांतील प्राध्यापकांना बोलावणे शक्य होईल.जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत भारतातील विद्यापीठे खूप मागे आहेत. क्रमवारी वाढविण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण संशोधन हाच एक पर्याय आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थी व प्राध्यापकांनी नावीन्यपूर्ण संशोधनाकडे लक्ष द्यावे, यासाठी सिंबायोसिसकडून लक्ष दिलेजाईल. नॅक मूल्यांकनाबरोबरच टाईम्स रँकिंग, एनआयआरएफ रँकिंग, वाढविण्याच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांनी प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या परदेशी व भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद व्हावा, या उद्देशाने सिंबायोसिसची स्थापना करण्यात आली. प्रथम सिंबायोसिस अंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात भारतीय व परदेशी विद्यार्थ्यांना एकत्र करून दिवाळी, रंगपंचमी, ईद, रक्षाबंधन असे सण साजर रण्यात आले. आता ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे ब्रीदवाक्य घेऊन सिंबायोसिसचे काम सुरू आहे. जगभरातील सुमारे ८० देशांमधील विद्यार्थी सिंबायोसिसमध्ये शिक्षण घेतात.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे अभिमत विद्यापीठात रुपांतर झाले आणि याच विद्यापीठाचा मी कुलपती झालो. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आता जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाचे स्थान उंचाविण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वच विद्यापीठांनी आपल्याला खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जा मिळावा, यासाठी पुढील काळात प्रयत्न करायला हवेत.सध्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्या हातांना कामाची गरज आहे.त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी नवनवीन प्रयोग राबवून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.राज्य शासनाने सिंबायोसिसला महाराष्ट्रात पहिले कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यास परवानगी दिली. या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच नामांकित कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला आहे. तरुणांना रोजगार देणे हे पहिले महत्त्वाचे काम आहे. त्यादृष्टीने शिक्षण संस्थांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे. त्यातून देशाच्या विकासाला गती मिळेल.

टॅग्स :S B Mujumdarशां. ब. मुजुमदारeducationशैक्षणिकPuneपुणे