शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षांनंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर अधिक जटिल झाले - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:39 IST

पैसे देऊन मत मागण्याइतका मी दरिद्री नाही, शेतकऱ्यांच्या तत्त्वासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार

पुणे : भगतसिंग यांनी महाविद्यालयीन वयात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला, सभागृहात आवाज उठवला. तरुण वयात शेतमालाच्या हमी भावाबद्दल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष केला. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी लढा सुरू आहे. मात्र आज शंभर वर्षांनंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर अधिक जटिल झाले आहेत. आजही विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत आहेत, याची कुणालाही लाज वाटत नाही. आज घराघरात भगतसिंग उदयाला यायला हवा, शेतकरी ज्या दिवशी सुखी होईल त्या दिवशी त्यांचा लढा खऱ्या अर्थाने पूर्ण होईल, असे प्रतिपादन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले.

सरहद संस्था व कृष्णा पब्लिकेशनच्या वतीने आयोजित ‘युगद्रष्टा भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ व भगतसिंगांच्या जीवनावरील ‘युगद्रष्टा भगतसिंग’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. टिळक रोड येथील आयएमएच्या डॉ. के. एच. संचेती सभागृहात शुक्रवारी (दि. २१) आयोजित समारंभास हुतात्मा भगतसिंग यांचे पुतणे व विचारवंत किरणजितसिंग, मायदेश फाउंडेशनचे संस्थापक अरुण जोशी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, केतन पुरी, सत्यशील राजगुरू, प्रकाशक चेतन कोळी, अनुवादक इंद्रायणी चव्हाण उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी चळवळीत ज्यांचा आदर्श घेऊन उतरलो त्या भगतसिंगांच्या नावाने मिळत असलेला पुरस्कार हा खूप मोठा सन्मान आहे. मला खात्री आहे की, मी त्या काळात असतो तर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांच्या सोबत काम केले असते, मलाही कशाची भीती वाटत नाही.संजय नहार म्हणाले, शालेय जीवनात शिकविलेला भगतसिंग वेगळा होता, प्रत्यक्षात साहित्यातून अनुभवलेला भगतसिंग वेगळा आहे. अरुण जोशी यांनी भगतसिंग यांच्या जीवनावरील पुस्तकाचे मराठीत भाषांतर तरुणांसाठी उत्साहवर्धक आहे. भगतसिंगांच्या परिवाराचे योगदान किती मोठे आहे, हे या पुस्तकातून समजते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढताना माझ्यावरही अनेक हल्ले झाले. आजही साम, दाम, दंड, भेदाचा वापर होत आहे. संघटना फोडून चळवळ कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्यावर अनेकदा अव्यवहार्य असल्याची टीका होते. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतच राहणार आहे. पैसे देऊन मत मागण्याइतका मी दरिद्री नाही. काही वर्षांपासून सभागृहात नाही म्हणून माझं काम थांबले नाही. शेतकऱ्यांच्या तत्त्वासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार. - राजू शेट्टी, शेतकरी नेते.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers' issues unresolved even after 100 years: Raju Shetti

Web Summary : Raju Shetti lamented that farmers' problems persist even after a century, leading to suicides. Speaking at an event honoring Bhagat Singh, he emphasized the need for farmers' prosperity and continued struggle for their rights. He highlighted the importance of farmers' movements and principles.
टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसाRainपाऊसfarmingशेती