शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

काही जणांना पक्षाचे अस्तित्व तर काहींना मुलांना प्रस्थापित करण्यासाठी निवडणुका महत्वाच्या : मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 7:51 PM

भाजपासाठी मात्र या निवडणुका देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे..

 पुणे : आगामी २०१९ ची लोकसभा अन् विधानसभा निवडणुका महत्वाच्या आहेत. परंतु, काहीजणांना ही निवडणुक आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी तर काहींना स्वत:च्या मुलांना राजकीय क्षेत्रात प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत महत्वाची वाटते आहे. भाजपासाठी मात्र या निवडणुका देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.  भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस म्हणाले, मागच्या सरकारला पॉलिसी पॅरालिसीस झाला होता. कोणत्याही क्षेत्रातले निर्णयच घेतले जात नव्हते. मोदी मात्र एकही क्षण वाया न घालवता काम करत आहेत. २१ व्या शतकात भारताला व्कासपथावर नेण्याची मुहूर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी यांनी रोवली. परंतु, त्यानंतरच्या दहा वर्षात काँग्रेस प्रणित आघाडी सरकारच्या काळात देशाची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली. गेल्या पंचावन्न महिन्यांत आता मोदी यांनी पुन्हा विकासाला वेग दिला आहे. येत्या काही वर्षातच भारत अमेरिका, चीन यांना मागे टाकील अशी स्थिती आहे. ती टिकवायची असेल तर मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी शिवाजी महाराज - अफझल खान युद्धाचा दाखला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले, महाराजांनी सर्व युध्द प्रसंगात शांततेने व्यूहरचना केली. आपले चौकी पहारे जागते ठेवले. खानाचे आत आलेले सगळेच्या सगळे सैन्य त्यांनी कापून काढले. मोठा विजय मिळवला. तो आजही ऐतिहासिक समजला जातो. आताची लढाईही तशीच आहे. ती तलवारीने लढायची नाही, पण मतदानाने लढायची आहे. बूथ म्हणजे चौकी, पहारे. तिथे असणारे कार्यकर्ते म्हणजे मावळे. आज काही अफजलखान नाही, मात्र त्याची प्रवृत्ती असणारे अनेकजण आहेत. त्यामुळे बूथ भक्कम ठेवा. ती खरी गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे