शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 7:47 AM

रोजगार देऊ म्हणणारे आता कुठे आहेत?

चोपडा/ भुसावळ (जि. जळगाव) :  गेल्या दहा वर्षांत इंधनाचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच  आहेत. शेतीमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत.  दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणणारे आज त्या विषयावर बोलत नाहीत. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते.  मात्र, केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी चोपडा येथे आयोजित सभेत केली.

 पवार म्हणाले की,  हमीभाव मिळावा म्हणून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.  वर्षभर ते आंदोलन चालले.  मात्र, तिथे जायला सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. उलट शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या गेल्या. आंदोलनात ७०० शेतकऱ्यांनी आपले जीव गमावले; पण, सरकारला काहीही फरक पडला नाही. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अशी अवस्था ही देशासाठी चांगली बाब नक्कीच नाही. 

भुसावळ येथे संतोषी माता सभागृहातही सभा झाली. तेथे शरद पवार म्हणाले, महागाईचे मुद्दे सोडून भाजप समाजात तेढ निर्माण करीत आहे.  जनतेला आता बदल हवा आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. देशात जे काही सुरू आहे ती लोकशाही महाराष्ट्राला मान्य नाही.

सरकारवर टीका केल्यास तुरुंगवास : पवार

या देशांमध्ये लोकशाही आहे, दिलेल्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.  मात्र केंद्र सरकारवर टीका केल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असल्याचे पवार म्हणाले.

केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक तरुण बेरोजगार झाले, महागाई वाढली, याबद्दल कोणीही काही बोलत नाही किंवा जनतेची दिशाभूल करून हे सरकार लोकांना संभ्रमात टाकून शासन चालवत आहे. देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर  भाजपला देशातून हद्दपार करावेच लागेल, असेही पवार भुसावळमध्ये म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४