पाठबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पेरणे बंधाऱ्याचा भराव गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 21:46 IST2025-06-20T21:46:14+5:302025-06-20T21:46:41+5:30
कोरेगाव भीमा - पेरणे बंध्याऱ्यातील अनेक दिवस दोन्ही पंचायतीने दुरुस्ती करण्याबाबत पत्र व्यवहार करूनही अभियंता यांनी जाणीवपूर्वक ग्रामस्थांना ढापे काढल्याची चुकीची माहिती २६ मे रोजी सांगितले.

पाठबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पेरणे बंधाऱ्याचा भराव गेला वाहून
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा-पेरणे बंधाऱ्यावरील फळ्या मे- जून महिन्याच्या सुरुवातीला सूचना देऊनही शाखा अभियंता आहेर यांनी गांभीर्याने न घेत फळ्या न काढल्यामुळे बंधाऱ्याचा भराव गेला वाहून गेला असल्याने पेरणे पाणी योजनेचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहेत. तर बंधाऱ्यालाही धोका निर्माण झाला आहेत.
कोरेगाव भीमा - पेरणे बंध्याऱ्यातील अनेक दिवस दोन्ही पंचायतीने दुरुस्ती करण्याबाबत पत्र व्यवहार करूनही अभियंता यांनी जाणीवपूर्वक ग्रामस्थांना ढापे काढल्याची चुकीची माहिती २६ मे रोजी सांगितले. यानंतरही पेरणे ग्रामपंचातीच्या सरपंच उषा दशरथ वाळके यांनी पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने अनेकवेळा दुरुस्तीच्या कामात अनियमितता व निकृष्ट दर्जाचे असल्याबाबतही तक्रार करूनही पाठबंधारे विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्याने या हलगर्जी पनाबाबत जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
बंधाऱ्याची संरक्षक भिंत दुरुस्त न करता भराव टाकण्याचे निकृष्ट दर्जाचे काम केले त्यात विभागास सांगूनही ते काम बंद न करता तसेच काम अर्धवट असूनही पूर्ण केले असल्याचे सांगितले. याबाबत पेरणे ग्रामपंचातीने वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याणे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहेत. बकोरी पाणीयोजना, वाघोली येथील सदनिका व जेएसपीएम कॉलेजची योजना तसेच लोणीकंद पावर हाऊस यासह शेतकऱ्यांच्या तब्बल चारशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पाणी योजनाही अडचणीत येणार आहेत. यावेळी वाहून गेलेल्या बंधाऱ्याची पाहणी माजी उपसरपंच प्रकाश ढेरंगे, भाजपा सरचिटणीस दशरथ वाळके, माजी सदस्य साईनाथ वाळके, तंटामुक्ती चे माजी उपाध्यक्ष कानिफनाथ ढेरंगे, महेश गव्हाणे, दत्ता ढेरंगे, बाळासाहेब दाभाडे, नितीन मलाव यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वेळेत ढापे न काढल्याने बंधाराही शेवटची घटका मोजतोय
मे महिन्याच्या शेवटी बंधाऱ्यावरील ढापे काढन्याच्या ग्रामस्थानी सूचना करूनही पाठबधारे विभागाने ढापे न काढल्याने बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असून बंधाऱ्यासही मोठा धोका निर्माण झाला असल्याने बंधाऱ्याही शेवटची घटका मोजत आहेत.
हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई
कोरेगाव भीमा पेरणे बंधाऱ्यावरील ढापे न काढल्याणे भराव वाहून जात बंधाऱ्यासही नुकसान झाले असल्याने याबाबत ग्रामस्थानी सूचना देऊनही पाठबंधारे विभागाने गांभीर्याने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांसह पेरणे पाणी योजनेचेही पाईप वाहून जात मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा-पेरणे बंधराच नवीन बनवा
कोरेगाव भीमा पेरणे बंधारा १९८५ मध्ये बांधकाम सुरू होऊन १९८८ मध्ये पूर्ण झालेल्या या ३७ वर्षे जुन्या बंधाऱ्यावर भीमा नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील तब्बल साडे चार हजार एकरहून अधिक शेती बंधाऱ्याच्या पाण्यावर आवलंबून आहेत. बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असल्याने नवीन आधुनिक पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी पेरणेच्या सरपंच उषा वाळके व कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी केली यांनी केली आहे.