शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत सरकारचे ठोस नियोजन आहे की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST

पुणे : मराठा आरक्षणप्रकरणी सरकारने ‘तुझं-माझं’ करण्यापेक्षा हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. आरक्षणाबाबत वेळोवेळी भूमिका बदलणा-या सरकारमध्ये सुरुवातीपासून समन्वयाचा ...

पुणे : मराठा आरक्षणप्रकरणी सरकारने ‘तुझं-माझं’ करण्यापेक्षा हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. आरक्षणाबाबत वेळोवेळी भूमिका बदलणा-या सरकारमध्ये सुरुवातीपासून समन्वयाचा अभाव होता. आरक्षणाबाबत काही ठोस नियोजन आहे की नाही, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक मागास सिद्ध केल होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. अंतिम सुनावणी मागील आठवड्यापासून सुरू झाली. शासनाने अन्य राज्यांचे दाखले दिल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला १९०२ साली ५० टक्के आरक्षण दिले होते. त्यामध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. स्वातंत्र्यानंतरही १९६७ पर्यंत एससी, एसटी, ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होता, असे संभाजीराजे म्हणाले.

नारायण राणे समितीने दिलेले आरक्षण टिकले नव्हते. सरकारच्या भूमिकेत समन्वय नव्हता. त्यामुळे सरकारने ठोस भूमिका घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे संभाजीराजे म्हणाले.

सरकारमध्ये समन्वय नाही की कोणता अ‍ॅक्शन प्लॅन नाही. अन्य राज्यांनी त्यांच्या अधिकारात ५० टक्क्यांच्यावर आरक्षण दिलेले आहे. इंदिरा साहनी अहवालात विशेष बाब म्हणून आरक्षण दिले जाऊ शकते असे नमूद करण्यात आलेले आहे. अपवादात्मक बाबीत राज्य सरकार आरक्षण देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार अपवादात्मक परिस्थिती आहे, हे सिद्ध करू शकत नाही. मागासवर्गीय अहवाल समजून सांगणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

राज्यसभेने नेमलेल्या सिलेक्ट कमिटीनेही आरक्षणाबाबतचा राज्यांचा अधिकार काढला जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. तसे प्रतिज्ञापत्र केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात द्यावे. आरक्षणाबाबत येत्या सोमवारी केंद्रीय समाजकल्याण मंत्री, समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, सचिवांची भेट घेणार असून यावेळी मराठा समाजातील अभ्यासक, विद्वान उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

====

आरक्षण मिळाले नाही तर हा अन्याय मराठा समाजाचा माणूस यापुढे सहन करणार नाही,. सत्ताधारी असो वा विरोधक सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. मंत्री अशोक चव्हाण यांनीही ‘इकडचे- तिकडचे’ करू नये. राज्य सरकारने १४ महिन्यांत प्रस्ताव का दिला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.