शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

संस्कार, मानवी मूल्ये, निसर्गाबरोबर छेडछाड करू नका; सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 06:42 IST

महावीर इंटरनॅशनल ऑनलाइन व्याख्यानमालेत प्रतिपादन

पुणे :  भगवान महावीरांनी आपल्या जीवनाद्वारे संस्कार, मानवी मूल्ये आणि निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश दिला आहे. ‘जगा आणि जगू द्या’  या मुख्य संदेशाद्वारेच विश्वशांती निर्माण होऊ शकते. मुलांना सुसंस्कारित करण्याची आवश्यकता आहे. मूल्यांचा ऱ्हास झाल्यास आपले जीवनच बरबाद होईल. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाबरोबर छेडछाड कराल, तर संपूर्ण मानवजातीलाच मोठा धोका निर्माण होईल. कोविड महामारी हा याचाच परिणाम आहे असे प्रतिपादन  ‘लोकमत समूहा’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन,  माजी खासदार आणि सकल जैन समाजाचे  राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी रविवारी केले.

भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणकनिमित्त महावीर इंटरनॅशनलच्या नाशिक शाखेद्वारे ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात, विजय दर्डा हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘महावीरांचे सिद्धांत आणि  विज्ञानाचे महत्त्व’ हा व्याख्यानाचा विषय होता. ते म्हणाले,“भावी पिढी सुसंस्कारित होईल अशा पद्धतीने साधूसंतांनी भगवान महावीर यांच्या विचारांचा प्रचार करावा. जेव्हा मानव एखाद्या क्षेत्रावर अतिक्रमण करतो, दुसऱ्याच्या अस्तित्वावरच कब्जा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तणाव निर्माण होतो. त्याचा विपरित परिणाम हा मानवावर होतो. निसर्गाबरोबर छेडछाड केल्याचा दुष्परिणाम आपण कोविड महामारीच्या रुपाने अनुभवत आहोत. भगवान महावीरांची शिकवण आम जनतेपर्यंत पोहोचविण्यात साधूसंत यशस्वी झाल्यास सकल जैन समाज हा मजबूत होईल. दया, करुणा, प्रेम आणि वात्सल्याची भावना ते  प्रत्येकामध्ये निर्माण करू शकतात.”

वाणीभूषण प्रीतिसुधाजी महाराज यांच्या १९९४ सालच्या नागपूर येथील चातुर्मासाच्या आठवणी सांगतानाच त्यांनी साध्वीजी या भगवतीस्वरुपा आहेत, असे नमूद केले. या कार्यक्रमात वाणीभूषण प्रीतिसुधाजी महाराज, क्रांतिकारी मधुस्मिताजी महाराज, मंगलप्रभाजी महाराज आदी साध्वीजी उपस्थित होत्या. नवकार महामंत्र आणि महावीरांना वंदन करून कार्यक्रमाचा प्रारंभ, तर मंगलपाठाने समाप्ती झाली. संस्थेच्या महिलाप्रमुख डाॅ. संगीता बाफना यांनी सूत्रसंचालन केले. तर नाशिक शाखेचे अध्यक्ष अनिल नाहर, सचिव राजेंद्र बाफना यांनी संयोजन केले.  ललीत सुराणा यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

भगवंतांचे सिद्धांत आत्मसात  करा : छाजेड

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केले. ते म्हणाले, ‘‘आज सर्वत्र भयावह वातावरण आहे. आम्ही अज्ञात शत्रूविरुद्ध लढाई लढत आहोत. २५०० वर्षांपूर्वी महावीरांनी आम्हाला जे तत्त्वज्ञान सांगितले त्या माध्यमातून ही लढाई आपण जिंकू शकतो. आपले आचार आणि विचार कसे असावेत, याचा संदेश भगवंतांनी आपल्याला दिला आहे. त्यानुसार आपल्याला चालायचे आहे. त्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व आत्मसात करा.” 

टॅग्स :Mahavir Jayantiमहावीर जयंती